वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनला क्यापाराच्या क्षेत्रात एकाकी पाडण्याचे धोरण भारत सरकारकडून जोरदारपणे चालवले जात असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये आता अन्य कंपन्याही आपली भूमिका सादर करताहेत. यामध्ये सध्या चीनमधील आपला व्यवसाय गुंडाळून 24 कंपन्या फोन उत्पादनाचे कारखाने भारतात उभारण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारी तणावासोबत तसेच कोरोनाच्या महामारीमुळे कंपन्या आपली पुरवठा साखळी दुसऱया बाजूला वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून चीनच्या बाहेर पडून अन्य ठिकाणी जाण्याची तयारी सदरच्या मोबाईल कंपन्या करत असल्याचे म्हटले आहे.
यामध्ये सॅमसंगसह दिग्गज कंपनी ऍपलसोबत अन्य कंपन्या भारतात येण्याची तयारी करीत आहेत. या कंपन्यांकडून भारतात मोबाईल फोन निर्मितीचे कारखाने उभारण्यासाठी जवळपास 11,222 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा दावा केला आहे.
चीन बाहेर जाणाऱया कंपन्या
साधारणपणे चीनमधून बाहेर पडणाऱया कंपन्या या व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, बांग्लादेश आणि थायलँड आदी ठिकाणी जाण्याचा विचार करत आहेत. याच काळात भारताने तत्परता दाखविल्यास या कंपन्या भारताकडे आकर्षित होण्यास मदत मिळणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
चीन बाहेर जाणाऱया कंपन्या
साधारणपणे चीनमधून बाहेर पडणाऱया कंपन्या या व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, बांग्लादेश आणि थायलँड आदी ठिकाणी जाण्याचा विचार करत आहेत. याच काळात भारताने तत्परता दाखविल्यास या कंपन्या भारताकडे आकर्षित होण्यास मदत मिळणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.