: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मोबाईल टॉवर उभारण्यच्या आणि सध्याच्या सेवा कार्यान्वित करण्याच्या विकेंद्रीकरणाच्या नियमावलीत दूरसंचार विभागाने शिथिलता केली आहे. त्यामुळे नवीन मोबाईल टॉवर चालू करण्यास सध्याचे टॉवर उद्ययावत केल्यानंतर 30 दिवसांनी स्व प्रमाणित अनुपालन अहवाल सादर करण्यास मान्यता दिली आहे.
नवीन मोबाईल टॉवर सुरु करण्याच्या अगोदर स्व प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. उद्योग संघटना सेल्युलर ऑर्पेटर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून दूरसंचार विभागाला (सीओएआय) पत्र लिहूननियमावलीत शिथिलता करण्याची विनंती केली आहे. सीओएआयने म्हटले आहे, की बंदमुळे कर्मचाऱयांसाठी मोबाईल टॉवरच्या साईट्सवर विकेंद्रीकरण सर्वेसाठी व्यावहारीक नसल्याचे स्पष्ट केले आहे. सीओएआयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी या संदर्भात दूरसंचार विभागाला 26 मार्च रोजी पत्र लिहले होते. त्यानंतर ऑर्पेटर्सना नियमावलीत शिथिलता केल्याने कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नसल्याचे विभागाना स्पष्ट केले आहे.