तीन देशांवर राहिला अधिकचा प्रभाव- उत्पादन एक वर्षांपासून प्रभावीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन कोविडच्या थैमानामुळे प्रभावीत होत आहे. चीन, व्हिएतनाम आणि तैवान या देशांसोबत पुरवठय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात अडथळे जाणवत असल्याचे दिसून आले आहे. चीनमध्ये निर्मिती आणि निर्यात केंद्र आणि आर्थिक उत्पादनाचेही महत्त्वाचे केंद्र म्हणून गणल्या जाणाऱया ग्वांग्झूमध्ये मार्च 2020 नंतर आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात संसर्गाची नेंद केली आहे.
व्हिएतनाम आणि तैवानमध्येही कोरोनाच्या नवीन संसर्गामध्ये वाढ नोंदवली जात आहे. साधारणपणे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि ऍपलचे पुरवठादार फॉक्सकॉन आणि लक्सशेअरची कार्यप्रणाली व्हिएतनाममध्ये मे महिन्यात दोन वेळा थांबवण्यात आली होती. चोवीस तास सुरु राहणारी जगातील सर्वात मोठी चिप निर्माती तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टीएसएमसी)ने कामगारांसाठी शिफ्टमध्ये काम करण्याची योजना तयार केली आहे.
कच्चा माल थांबणार?
तज्ञांच्या माहितीनुसार जर विदेशात कोरोना स्थिती नियंत्रणात न आल्यास जूनमध्ये भारतात कच्च्या मालाचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात घटणार आहे. भारताला या तीन्ही देशांमधून फोन असेंबलीसाठी आवश्यक सुटय़ा भागांपैकी 85 टक्केपेक्षा अधिकचे भाग मिळतात. परंतु सदर देशांमध्ये नवीन संसर्गाच्या भीतीमुळे भारताला आवश्यक असणाऱया स्मार्टफोन इंडस्ट्रीसाठीच्या सुटय़ा भागांचा पुरवठा बाधित होण्याची माहिती आहे.