प्रतिनिधी /मोरजी
मोरजीच्या सरपंच वैशाली शेटगावकर यांनी अपेक्षेनुसार पती मच्छींद्रनाथ उर्फ बाबू शेटगावकर यांच्यासहित पंचायत मंडळासोबत भाजपात प्रवेश करून आमदार दयानंद सोपटे याना विजयी करण्याचा निर्धार केला.
मांदेचे आमदार दयानंद सोपटे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोरजी पंचायत क्षेत्रातील घरोघरी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यावेळी सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच तुषार शेटगावकर, पंच मुकेश गडेकर, पंच विलास मोरजे, पंच सुप्रिया पोके, पंच प्रकाश शिरोडकर आणि मच्छींद्रनाथ उर्फ बाबू शेटगावकर यांनी भाजपात प्रवेश केला.
प्रवेश कार्यक्रमाला आमदार दयानंद सोपटे, मांदे मतदारसंघ भाजपा निरीक्षक गोरख मांदेकर, भाजपा मंडळ अध्यक्ष मधू परब, भाजपा महिला नेत्या डॉ. शीतल नाईक, मांदे महिला अध्यक्षा दीपा तळकर, अनिशा केरकर, नयनी शेटगावकर, तारा हडफडकर, पंच ममता सातार्डेकर, दीपश्री सोपटे, पार्से सरपंच प्रगती सोपटे, तुये माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, माजी सरपंच अनंत गडेकर, तुये सरपंच सुहास नाईक, माजी सरपंच मंदार पोके. पेडणे नगराध्यक्षा उषा नागवेकर आदी उपस्थित होते. नयनी शेटगावकर यांनी स्वागत केले.
सरपंच वैशाली शेटगावकर म्हणाले की, आपण आज रितसर भाजपात प्रवेश केला. आपल्यावर यापूर्वी दररोज आरोप होत होता आपण सोपटेचे समर्थक. आपण काँग्रेसला प्रामाणिक काम केले. मागच्या निवडणुकीत आम्हाला पक्षाने कसलीच जबाबदारी दिली नाही. आता काँग्रस पक्षाला ग्रहण लागले आहे. काँग्रेसचा उमेदवार जाहीर होतो, तेव्हा नेते कुठेच नसतात. आता आपल्यासोबत आपले समर्थक आहेत तेही भाजपात असणार, असे सांगितले.
तरच भाजपात प्रवेश
मुलांची कामे आणि विकास होत असेल तर आपण भाजपात प्रवेश करीन असे आपण आमदार दयानंद सोपटे याना शब्द दिला होता, त्यानुसार आमदार दयानंद सोपटे यांनी विकास कामाबरोबरच बेरोजगार युवकाना रोजगार देण्याचे काम केले. त्यामुळेच आपण पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी एका घरात तीन तीन सरकारी नोकऱया
सरपंच वैशाली शेटगावकर यांनी पुढे बोलताना यापूर्वीचे या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार हे मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाले, त्यांनी केवळ एका घरात तीन तीन सरकारी नोकऱया देण्याचे काम केले, त्याबद्दल नाराजी व्यक्त करून आमदार सोपटे यांनी गरज ओळखून सरकारी नोकऱया त्यामुळेच मी भाजपाकडे गेल्याचे तिने सांगितले.
केंद्रातील निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने आहे आणि भविष्यातही भाजपा शिवाय राज्याला पर्याय नसल्याचा दावा सरपंच वैशाली शेटगावकर यांनी केला.