आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार : काँग्रेस, आपचा आंदोलकांना पाठिंबा
वाळपई / प्रतिनिधी
शेळ मेळावली येथे उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या सीमांकन कामाला मंगळवारी अडथळा आणल्यानंतर संध्याकाळी वाळपई मतदारसंघ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दशरथ मांदेकर व आम आदमी पक्षाचे विश्वेश प्रभू यांना अटक करण्यात आल्यानंतर काल बुधवारी सकाळी तीनशेच्या आसपास नागरिकांनी पोलिसस्थानकावर मोर्चा नेऊन त्यांची सुटका करण्याची जोरदार मागणी केली. मोर्चाला आम आदमी पक्ष व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा लाभलेला हा मोर्चा तीन तास चालला.
दशरथ मांदेकर व विश्वेश प्रभू यांची वाळपई प्रथम न्यायदंडाधिकाऱयांनी वैयक्तिक दहा हजारांच्या हमीवर सुटका करण्यात आली. आंदोलनकर्त्याना पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केल्यास वाळपई पोलिसस्थानकावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आयआयटी विरोधी आंदोलक, काँग्रेस पक्ष व आम आदमी पक्षाने सरकारला दिलेला आहे.
मंगळवारी रात्री झाली दोघांना अटक
मंगळवारी आयआयटी प्रकल्पाचे सीमांकन करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱयांना ग्रामस्थांनी अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ग्रामस्थांनी काम बंद पाडल्याने काही आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर मंगळवारी रात्री दशरथ मादेकर, विश्वेश प्रभू यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
वाळपई शहरातून पोलिसस्थानकावर मोर्चा
बुधवारी सकाळी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राहुल म्हांबरे व इतरांनी वाळपई पोलीस स्थानकावर धाव घेतली. आंदोलकांवर गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अटकेच्या निषेधार्थ शेळ मेळावली भागातील चारशेच्या आसपास नागरिकांचा सहभाग असलेला निषेध मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आला. वेगवेगळय़ा घोषणा देत हा मोर्चा वाळपई शहराच्या भर बाजारातून वाळपई पोलीस स्थानकावर आला. आंदोलनकर्त्यांनी अटक करण्यात आलेल्या दशरथ व विश्वेश यांची दोन तासांच्या आत सुटका करण्याची मागणी केली.
काँग्रेसनेत्यांचा पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार
काँग्रेसचे संकल्प आमोणकर, वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, महिला काँग्रेस अध्यक्ष रोशन देसाई, नंदकुमार कोपर्डेकर, कृष्णा नेने आदींनी डिचोली उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांची वाळपईच्या पोलीस स्थानकावर भेट देऊन त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे. मात्र हा अधिकार सरकार पोलीस बळाचा वापर करून हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मंगळवारी मुरमुणे याठिकाणी सीमांकन कामाला सनदशीर पद्धतीने विरोध करण्यात आला होता. हे आंदोलन चिरडण्यासाठी दशरथ व विश्वेश यांना जबरदस्तीने अटक करून पोलीस अमानुषपणे बळाचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलनात आप सक्रियपणे सहभागी : म्हांबरे
आम आदमी पक्षाचे राहुल म्हांबरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सरकार या भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज पोलिसी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. एका बाजूने सरकार आपण सर्वसामान्यांचे राखणदार असल्याचे सांगत आहे तर दुसऱया बाजूने या लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. आम आदमी पक्ष आता या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असून सरकारने या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा उलट परिणाम होणार असल्याचा इशारा म्हांबरे यांनी दिला.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दशरथ मांदेकर व विश्वेश प्रभू यांची वाळपईच्या प्रथम न्यायदंडाधिकाऱयांनी वैयक्तिक दहा हजार रुपयांच्या हमीवर सुटका केली. त्यांच्या बाजूने ऍड. राजन सावईकर यांनी बाजू मांडली. त्यानंतर सुटका झालेल्या दोघांचेही टाळय़ा वाजून व पुष्पहार घालून जोरदारपणे स्वागत करण्यात आले.
सुटका झाल्यानंतर सरकार, राणे विरोधात जोरदार टीका
सुटका झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दशरथ मांद्रेकर यांनी सांगितले की आपणाला अमानुषपणे वाळपई पोलिसांनी अटक करून कोठडीत डांबण्याचा प्रयत्न केला. गरज पडल्यास मरण पत्करणार, मात्र आयआयटी या भागातून हद्दपार होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. आमदार विश्वजित राणे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कुटिल नितीने आपल्याला अटक केली, असे ते म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांनीही सरकारच्या दबंग’गिरी विरोधात टीका करून या आंदोलनाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेला आहे. सरकारला हिंमत असेल तर सरकारने सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न निकालात काढावा, अशी जोरदार मागणी प्रभू यांनी केली.