प्रतिनिधी / कोल्हापूर
मुळी बांधणी (पालापाचोळा) वाजवट 1 टक्क्या पेक्षा जास्त करता येणार नाही. केल्यास कडक कारवाई करु अशा इशारा वजा नोटीस साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी विभागातील कारखान्यांना बजावल्या आहेत. अशी माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, जयशिवरायचे शिवाजीराव माने, बळीराजाचे बी. जी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. जर कोणता कारखाना अशी वाजावट करत असेल तर संपर्क साधण्याचे आवासनही त्यांनी केले आहे.
ते म्हणाले, मजूर टंचाईमुळे राज्यभरात 490 मशीनच्या सहायाने ऊस तोड सुरु आहेत. तरी ही कारखाने 5 टक्के मुळी बांधणी (पालापाचोळा) वाजावट ऊसाच्या वाजनातून करत होते या कपातीस आम्ही हंगामाच्या सुरवातीपासून विरोध केला होता. आमच्या हरकतिचा विचार कारून कोल्हापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी 5 एवजी 1 टक्का कपात करण्यास सुरवात केली. बाकीचे कारखाने 5 टक्के कपात सुरू ठेऊन शेतकऱयांची राजरोसपणे लूट करू लागल्याने 26 जानेवारी रोजी साखर आयुक्तालयावर आंदोलन केले. त्याची दखल घेवून गुरुवारी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना मुळी बांधणी पोटी 1 टक्क्या पेक्षा जास्त वाजवट करता येणार नाही, असे आदेश साखर आयुक्तांनी काढले आहेत.
शेतकऱ्यांचे 250 कोटी वाचले
करोनामुळे ऊस तोड मजूर येणार नाहीत. म्हणून राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी मशीन ने ऊस तोड मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. एकूण गाळपाच्या 25 ते 30 टक्के ऊस मशीनने तोडला जाणार आहे. या वर्षी राज्याचे गाळप 10 कोटी टन धरल्यास त्याच्या 25 टक्के मशीन तोड झाली. तर 5 टक्के कपाती प्रमाणे 12 लाख 50 हजार टन ऊस होतो. साखर आयुक्तांच्या आदेशानंतर 4 टक्के कपात कमी केली आहे. त्यामुळे 10 लाख टन ऊसाची होणारी कपात वाचली असून या 10 लाख टनाचे प्रती टन 2500 रूपयाप्रमाणे जवळपास 250 कोटी रुपये शेतकऱ्यांचे वाजणार आहेत. असा दावाही मान्यवरांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी सदाशिव कुलकर्णी, दत्ता पाटील, बाजीराव पाटील, बंडा पाटील, शितल कांबळे, बजरंग अवघडे, राजेश पाटील, शिवाजी शिंदे. श्रीधर शेट्टी आदी उपस्थित होते.