इस्लाम नूतन वर्षारंभ : मोहरमलाही आजपासून सुरुवात : सणाबाबत शिया-सुन्नी यांच्या वेगवेगळय़ा रुढी-परंपरा
प्रतिनिधी /बेळगाव
इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याला म्हणजेच मोहरमला बुधवार दि. 11 पासून सुरुवात होत आहे. या महिन्यानेच इस्लामच्या नूतन वर्षाला प्रारंभ होतो. मोहरमला विशिष्ट अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या महिन्यात मुस्लीम धर्म संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीला मुस्लीम बांधव या दिवशी अभिवादन करतात.
तारीख-ए-इस्लाम
इराकची राजधानी म्हणून ओळखल्या गेलेल्या बगदादच्या करबला या गावात ‘तारीख-ए-इस्लाम’ हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. इस्लाममध्ये नेता म्हणजेच ‘खलिफा’ निवडण्याची प्रथा आहे. मोहम्मद पैगंबरांनंतर असे चार खलिफा निवडले गेले.
तथापि, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असणारे अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीद याने स्वतःला खलिफा म्हणजेच नेता म्हणून घोषित केले. परंतु इस्लाममध्ये अशा स्वयंघोषित बादशाहीची संकल्पना नक्हती. शिवाय यजीद प्रुरकर्मा म्हणूनही ओळखला जात होता. त्यामुळे त्याला खलिफा म्हणून मान्यता देण्यास पैगंबरांच्या नातवंडांसह समाजातील विविध घटकांनीही नकार दिला.
याचा सूड म्हणून यजीदने हुसैनचे शिरकाण करण्याचे फर्मान सोडले. एका रात्री हुसैनला राजभवनमध्ये बोलावून यजीदचे हे फर्मान सांगण्यात आले. मात्र, ते धुडकावून हुसैन मक्केच्या दिशेने निघाले. तेव्हा संतप्त यजीदने आपले सैन्य हुसैनना मारण्यासाठी पाठविले. हुसैन व त्यांचे आप्तगण, मित्रपरिवार करबला येथे पोहोचले असताना यजीदच्या सैन्याने त्यांच्यावर आक्रमण केले. हुसैन यांनी इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु या समजावण्याचा त्यांच्या सैन्यावर परिणाम झाला नाही.
मातम का महिना
करबला येथे युद्ध सुरू झाले आणि हुसैन यांचे 72 अनुयायी या लढाईत कामी आले. केवळ हुसैन आणि त्यांचा सहा महिन्याचा पुत्र अलीअसगर हे जीवित राहिले. या बाळासाठी हुसैन यांनी सैन्याकडे पाण्याची विनवणी केली. परंतु सैन्याने बाण मारून या बाळाची हत्या केली व नंतर हुसैन यांनाही ठार मारले. म्हणूनच मुस्लीम बांधव या महिन्याकडे मातम का महिना म्हणून पाहतात. या दिवशी हसन आणि हुसैन यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.
यजीदच्या सैन्याने अलीअसगर या बाळाला पाणी दिले नाही याची आठवण या समाजाला आजही आहे. म्हणूनच मोहरमच्या दिवशी आणि या महिन्यात ठिकठिकाणी थंड पाण्याची सोय केली जाते. या युद्धानंतरच मुस्लीम धर्माचे शिया व सुन्नी अशा दोन वर्गात विभाजन झाले. दोन्ही वर्गांच्या वेगवेगळय़ा रुढी, परंपरा असून त्यानुसार ते मोहरम आचरणात आणतात.
मक्का-मदिना पवित्र स्थळे
मुस्लीम समाजात ‘मक्का आणि मदिना’ ही दोन पवित्र स्थळे मानली जातात. हुसैन आणि त्यांच्या परिवारातील सर्वांची अत्यंत प्रुरपणे हत्या झाली. याचे दुःख आजही या समाजाला आहे. म्हणूनच आजसुद्धा या समाजातील काही लोक स्वतःला शस्त्राने जखमी करून घेतात. यजीदने हुसैनवर प्राणघातक हल्ला केला. त्याचे शीरकाण केले. त्यांच्यावर झालेल्या अत्याचारासमोर आपली ही कृती फार क्षुल्लक आहे, असे हे लोक मानतात.
शिया आणि सुन्नी दोघेही मोहरम आचरणात आणतात. फक्त शिया एक महिना त्याचे दुःख व्यक्त करतात आणि शरीराला घायाळ करून घेतात. सुन्नी पंथीय मोहरमच्या आधी दहा दिवस दुःख (मातम) व्यक्त करतात. परंतु स्वतःला इजा करून घेत नाहीत. स्वतःला आणि कोणालाही घायाळ करण्याची परवानगी (इजाजत) खुदा देत नाही, असे हे मानतात.
दुःखात काळे कपडे का घालतात?
काळा रंग हा विरोधाचे, निषेधाचे प्रतीक आहे. जेव्हा शिया पंथीय मोहरमची मिरवणूक (जुलुस) काढतात, तेव्हा ते काळे कपडे परिधान करतात. हुसैन यांच्या हत्येचा निषेध म्हणून काळा रंग त्यांनी निवडला आहे.
धर्मात प्रथा न पाळणारेही…
महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तर कर्नाटकात म्हैसूर, धारवाड, बेळगाव, हुबळी येथे मोहरमचे वाघ म्हणजेच सोंगे काढली जातात. लहान मुलांच्या गळय़ात फुलांच्या माळा घालून डोक्मयावर मोरपीस लावून त्यांच्या दंडाला हिरवा कपडा बांधला जातो. काही हौशी मंडळी शरीराला पिवळा रंग देऊन त्यावर काळेपट्टे ओढतात. वाद्यांच्या साथीने त्यांची मिरवणूक काढली जाते. निरोगी आरोग्यासाठी ही प्रथा पाळली जाते, अशी धारणा आहे. अर्थात या सर्व प्रथा न मानणारे लोकसुद्धा आहेत. बऱयाच मशिदींमध्ये या गोष्टी करू नका, असे जाहीर केले जाते. मात्र, जुन्या पिढीतील ज्ये÷ मंडळी शहिदांबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी या प्रथा आजही पाळतात.
हिंदूंकडून आदरभाव…
बेळगावमध्येसुद्धा झेंडा चौक, दरबार गल्ली, गांधीनगर यासह विविध ठिकाणी पंजे आणि ताबूत बसविले जातात. ग्रामीण भागातही ही प्रथा पाळली जाते. भारतात सर्व धर्मांचा आदर करण्याची संस्कृती आहे. म्हणूनच बेळगावमध्ये गणेशोत्सवात मुस्लीम बांधव मिरवणुकीचे स्वागत करतात. हिंदू बांधव ताबूत असलेल्या ठिकाणी जाऊन आदरभाव व्यक्त करतात.
नोहा आणि मर्सिया
हुसैन यांच्या बलिदानाचा शोक म्हणून मर्सिया व नोहा म्हणजेच शोक गीते गायली जातात. मर्सियाचे पठण करताना पुरुष, स्त्रिया, मुले, वृद्ध आपले ऊर बडवून घेऊन दुःख व्यक्त करतात. त्याला नोहा म्हणतात तर मर्सिया गीताचे फक्त वाचन केले जाते.
पंजा म्हणजे बदामाकृती काठीला फुलांचे आच्छादन करून ती हातात घेऊन चालण्याची प्रथा आहे. पंजा हाती धरणाऱया व्यक्तीला सलग तीन वर्षे त्या इंगळय़ांवरून चालण्याचा मान दिला जातो. ताबूत, पंजा आणि फातिमा बेबीचे प्रतिक उभे करणारे सर्व लोक आपापल्या गल्ल्यांमधून जुलुस काढून एका मध्यवर्ती ठिकाणी येतात. तिथे त्यांनी हाती धरलेले झेंडे परस्परांच्या झेंडय़ांना भिडवून मिलाप केला जातो.