संजीवकुमार विचारेंनी स्वअनुभवांची मांडली व्यथा : जिल्हा प्रशासनाकडे सोशल मिडीयाद्वारे मागणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे विविध गावांमधून अनेक रुग्ण येतात…दिवस दिवस बसून असतात…त्यानंतर बेड रिकामे होतील तशी त्यांची व्यवस्था केली जाते… मुळात रुग्ण दिवसभर भितीने अर्धमेला झालेला असतो… त्यानंतर कोविड सेंटरवर जागा नसल्याचे कळते … मग त्याला दुसऱया सेंटरवर पाठवले जाते …यात रुग्णांच्या होणाऱया परवडीकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी मिरजोळे येथील सामाजिक कार्यकर्ते संजीवकुमार विचारे यांनी केली आहे.
प्रशासनस्तरावरून ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ ही मोहिम स्वागतार्ह आहे. पण या मोहिमेतून निष्पन्न होणारे पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करायचे कुठे, याचा प्रशासनस्तरावरून गांभीर्याने आढावा घेतला जावा अशी अपेक्षा विचारे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. गेले आठ दिवस ते स्वतः रुग्णांना उपचारासाठी स्व-मालकीच्या वाहनाने मोफत सेवा देत आहेत. त्यावेळी येणारा अनुभवांनंतर त्नीं आपले मत व्यक्त केले आहे.
महिला जिल्हा रुग्णालय येथे रुग्ण आल्यानंतर तेथील व्यवस्थापनाला कुठल्या कोविंड केअर सेंटरला किती बेड शिल्लक आहेत याची माहिती नसते. विविध गावांमधून आलेले रुग्ण दिवस दिवस तेथे बसून असतात. दिवसभर भितीने अर्धमेला झालेल्या या रुग्णाला कोविड केअर सेंटरला पाठवले जाते. त्या सेंटरच्या परिचारिका किंवा व्यवस्थापन सेंटरवर जागा नसल्याचे सांगतात. यानंतर त्या रुग्णाला परत दुसऱया सेंटरवर पाठवले जाते. यात रुग्णांची परवड होते. हा प्रकार गेले आठ दिवस आपण स्वतः अनुभवत असल्याचे विचारे यांचे म्हणणे आहे.
कित्येक रुग्ण ऑक्सिजन लावून इतर उपचाराविना दिवस दिवसभर तेथे पडून असतात. तेथील डॉक्टरांचा, व्यवस्थापनाचाही नाईलाज आहे. बेड शिल्लक नसतील तर ते लोक तरी काय करतील हे प्रशासनाने पाहिले पाहिजे. होम आयसोलेशनसाठी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची अट रद्द करून आवश्यक औषधे व सूचना देऊन रुग्णांना त्यांच्या घरी विलगीकरण करता पाठवले, तर यंत्रणेवरचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले आहे.
कोविड टेस्ट करताना हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुद्धा नागरिकांची परवड होत आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन जाऊन करावे लागत असल्याने व तेथील कर्मचाऱयांना ओपीडीचा भार सांभाळत काम करावे लागत असल्याने तेथे नागरकांना चार ते सहा तास थांबणे भाग पडते.
विचारे गेले आठ दिवस स्वतःच्या वाहनाने कोविड संदर्भात मोफत वाहतुक सेवा देत आहेत. रुग्णांना मिरजोळे ते हातखंबा व निष्पन्न झाल्यानंतर मिरजोळे ते जिल्हा महिला रुग्णालय येथे नेण्याचे काम ते सामाजिक भान राखत करत आहेत. यावेळी विविध ठिकाणी आलेल्या अनुभवांतून त्यांनी प्रशासनाच्या विचारार्थ काही मुद्दे समाज माद्यमाद्वारे मांडले आहेत. सर्व अडचणींवर योग्य उपाययोजना करून मोहीम राबवली तर ती उत्तम प्रकारे यशस्वी होईल अशी आशा त्यांना वाटते. आपल्यासारख्या सामान्य माणसाला वरिष्ठ अधिकाऱयापर्यंत प्रत्यक्ष पोहोचून निवेदन देणे शक्य नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचावे यासाठी विचारे यनी हा प्रयत्न केल्याचे ते म्हणतात.
अशी होतेय परवड…!
महिला जिल्हा रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी सहा वाजता घेऊन गेलेल्या दोन महिला व दोन लहान मुले यांना रात्री 10 वाजता गोगटे कॉलेज येथे पाठवण्यात आले. तेथे गेल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. नंतर अन्य अधिकाऱयांना विनंती करून परत आंबेडकर भवन येथे रात्री 11 वाजता ऍडमिट करून 5 तासांनी मी माझ्या घरी परत आलो. या एकाच उदाहरणावरून रुग्णांची परवड लक्षात येईल.
– सजीवकुमार विचारे, मिरजोळे.