ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
म्यानमारमधील लष्कराच्या बंडानंतर आश्रय घेण्यासाठी भारताच्या ईशान्येकडील राज्यात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखून त्यांचे वेगाने प्रत्यार्पण करावे, हा केंद्र सरकारचा आदेश स्वीकारार्ह नाही. याउलट मानवतेच्या दृष्टिकोनातून या निर्वासितांना देशात आश्रय द्यावा, अशी मागणी मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
झोरामथांगा म्हणाले, म्यानमारमधील लष्करी बंडानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांसह शेकडो निर्वासित मिझोराममध्ये आले आहे. मिझोराममधील लोकांशी त्यांचे वांशिक संबंध आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदींनी यात मध्यस्थी करून मानवतेच्या दृष्टीने त्या निर्वासितांना आश्रय द्यावा, असे झोरामथांगा यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.