ऑनलाईन टीम / चुराचंदपूर :
म्यानमार सीमेजवळ आज सकाळी दहाच्या सुमारास 46 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर, त्यांची पत्नी, मुलगा, ड्रायव्हर आणि तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
बिरेन सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 46 एआरच्या ताफ्यावरील भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात आज चुराचंदपूर येथे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबासह काही कर्मचारी मारले गेले आहेत. राज्य दल आणि निमलष्करी दल अतिरेक्यांच्या मागावर आहेत.