वृत्तसंस्था/ मुंबई
मार्च 2020 नंतरच्या कालावधीमध्ये भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. पेन्नी व मल्टीबॅगर समभागांनी तर गुंतवणूकदारांना कमी कालावधीत हजार टक्के इतका जबरदस्त परतावा दिला असल्याचे दिसून आले आहे. यात म्युच्यअल फंडांनीदेखील चांगला परतावा दिल्याचे दिसले आहे.
मार्च 2020 मध्ये बीएसई सेन्सेक्स घसरून 25 हजार 638 अंकांपर्यंत व्यवहार करत होता. सध्याला भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 57 ते 58 हजार अंकांवर व्यवहार करत आहे. बीएसईमधील गुंतवणूकदारांना दरम्यानच्या कालावधीमध्ये 130 टक्केपर्यंत परतावा मिळाला आहे. अशा गुंतवणूकीत जोखीम भरपूर आहे तेव्हा योग्य माहितीच्या आधारे गुंतवणूक करणे या क्षेत्रामध्ये आवश्यक झाले आहे. अन्यथा नुकसानही सोसण्याची तयारी असायला हवी, असे यातील विश्लेषक सांगतात.
गुंतवणूकीत आता म्युच्युअल फंडांनाही महत्त्व वाढत आहे. शेअर बाजारात समभागांच्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. या अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकदेखील वाढली असल्याचे दिसले आहे. गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडमधील काही कंपन्यांनी वर्षभरात 70 टक्के, 3 ते 5 वर्षापर्यंत गुंतवणूकदारांना 30 टक्के इतका परतावा दिलेला आहे.
कंपनी मिळालेला परतावा 1 वर्षö3 वर्षे
टाटा डिजिटल इंडिया………….. 95 टक्के….. 41 टक्के
आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल टेक्नॉलॉजी…. 98 टक्के 43 टक्के
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया.. 86 टक्के 41 टक्के
एसबीआय टेक अपॉर्च्युनिटी ….. 84 टक्के….. 39 टक्के
मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 एटीएस 36 टक्के 31 टक्के