वजन वाढण्याची बरीच कारणं असू शकतात. चुकीची जीवनशैली तसंच आहाराच्या चुकीच्या पद्धती हे वजन वाढण्याचं प्रमुख कारण असलं तरी थायरॉईड, हार्मोन्समधले बदल, विशिष्ट औषधांचं सेवन यामुळेही स्थूलपणा येऊ शकतो. नियमितपणे घेतल्या जाणार्या या औषधांमुळे आराम मिळत असला तरी त्यामुळे वजनही वाढू शकतं. म्हणूनच वजनवाढीच्या कारणांचा शोध घेताना ही बाब लक्षात घ्यायला हवी. वजनवाढीला कारणीभूत ठरणार्या औषधांविषयी…
* रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना बराच त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी ऍस्ट्रॉजेन-प्रोजेस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरेपीचा पर्याय निवडला जातो. यामुळे जास्त भूक लागते. शरीरात पाणी साठू लागतं. रक्तातल्या साखरेचं प्रमाणही वाढतं. परिणामी शरीरात अतिरिक्त चरबी साठू लागते. यामुळे रजोनिवृत्तीनंतर महिलांचं वजन वाढतं.
* मायग्रेनच्या औषधांमुळे सारखी भूक लागते. सतत खाल्ल्यामुळे वजन वाढू लागतं.
* अस्थमा, आथ्रायटिससारख्या आजारांमध्ये स्टेरॉईड गटातली औषधं घ्यावी लागतात. या औषधांमुळे स्वादुपिंडात भूक वाढवणारे हार्मोन्स स्रवू लागतात. यामुळे अतिखाणं होतं. शिवाय ही औषधं रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढवतात. या सगळ्याचा चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि वजन वाढू लागतं. * निरोगी जीवनशैलीचा अवलंब करूनही वजन वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पर्यायी औषधांबाबत विचारणा करा. स्वतः कोणताही निर्णय घेऊ नका. तसंच आजार बरा होणं अधिक महत्त्वाचं आहे. वजनावर नंतरही नियंत्रण मिळवता येतं. त्यामुळे औषधोपचार थांबवू नका.