बेळगाव पोलिसांची गरीब व्यापाऱयांवर दंडुकेशाही
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या बेळगाव पोलिसांनी रस्त्याशेजारी खाद्यपदार्थ विकणाऱया व्यापाऱयांना टार्गेट केले आहे. शहर व उपनगरांमध्ये चोऱया वाढल्या आहेत. म्हणून दहा वाजताच दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात येत असून त्यासाठी फेरीवाले, व्यापाऱयांवर दंडुकेशाहीचा प्रयोग केला जात आहे. पोलिसांच्या या मनमानीला गरीब व्यापारी अक्षरशः वैतागले आहेत. चोरांना पकडता येत नाही म्हणून पोलीस व्यापाऱयांना टार्गेट करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच महिने बेळगाव येथील सर्व व्यापार ठप्प होते. आता रुग्णसंख्या घटत चालल्यामुळे हळुहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच पोलिसांनी व्यापार मोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामागे त्यांचा नेमका उद्देश तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कसल्याही प्रकारचा आदेश नसताना लाठीच्या जोरावर व्यापारी व ग्राहकांना मारहाण करण्याचे प्रकार शहर व उपनगरांत सुरू आहेत.
यासंबंधी तरुण भारतने पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याशी संपर्क साधला असता रात्री 11 वाजता व्यवहार बंद करण्यास सांगितले आहे. 10 वाजता बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी सांगितले असले तरी पोलीस मात्र 9.45 पासूनच शिट्टी वाजवण्यास सुरूवात करीत आहेत. तर 10 पासून दिशेल त्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलीस आयुक्त कार्यालय झाल्यापासून या ना त्या कारणाने ते नेहमी चर्चेत आहे. आयुक्तांना अंधारात ठेवून कनिष्ट अधिकारी अनेक उद्योग सुरू केले आहेत. वाढत्या चोऱया, घरफोडय़ांच्या पार्श्वभूमिवर मध्यरात्री 12 नंतर फिरणाऱयांना अडवून त्यांची चौकशी केली जात आहे. याला कोणाचाच आक्षेप नसला तरी 10 वाजता व्यवहार बंद करण्यासाठी दिसेल त्याला मारहाण करीत फिरणाऱया पोलिसांवर कोणती कारवाई करणार? याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
खरे तर रात्री 11 वाजता व्यवहार बंद करण्याची सूचना वरि÷ अधिकाऱयांनी दिली असली तरी 9.45 पासूनच पोलीस मैदानात उतरतात. फेरीवाले, खाऊचे गाडीवाल्यांवर दादागिरी करत त्यांना मारहाण केली जाते. मात्र या फेरीवाल्यांशेजारीच असलेले बडे हॉटेल, मध्यरात्री बारा पर्यंत बार उघडे असतात. त्यांच्यामुळे गुन्हेगारी वाढत नाही का? केवळ रस्त्या शेजारी खाऊ विकणाऱयांमुळे गुन्हेगारीत वाढ होते, असा जावई शोध कुणी लावला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त साधव होतील का?
रात्री 10 पासून व्यवहार बंद करुन आधीच आर्थिक संकटात असलेल्या गोर-गरीब व्यापाऱयांचे कंबरडे मोडण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला असून यासाठी आयुक्तांचीही दिशाभूल करण्यात आली आहे. बडय़ा हॉटेलांना मध्यरात्रीपर्यंत मुभा देवून केवळ किरकोळ विपेत्यांवर दंडुकेशाहीचा प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस दलाबद्दल जनमाणसांत नाराजी वाढत चालली असून पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी वेळीच साधव होवून दहशत माजविणाऱया पोलिसांना आवर घातली नाही तर पोलीस दलाची प्रतिमा मलीन होणार यात शंका नाही.
पोलीस ‘पाटलां’ची लुटमारी
एकीकडे गोर-गरीब व्यापाऱयांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे पोलीस पाटील आपण घर बांधत आहोत, आपल्याला काही तरी मदत करा, असे सांगत अक्षरशः लुटमारीला उतरले आहेत. गुन्हे तपास विभागात म्हणून घेतलेले अनेक जण सध्या गुन्हेगारांशी हातमिळवणी करुन गब्बर झाले आहेत. काही पोलिसांच्या उर्मटपणामुळे पोलीस दलाची पर्यायाने सरकारची प्रतिमा डागाळत चालली आहे.