प्रतिनिधी/ म्हसवड
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे भिमा अनुयायाचा सर्वात मोठा उत्सव यावेळी मात्र या उत्साहावर कोरोना व्हायरस या संसर्गाने भिमा अनुयायीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले 129 वर्षात पहिल्यांदाच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरात साजरी करण्याचा योग महाराष्ट्रासह देशाला कोरोना या विषाणूंने आला म्हसवड व परिसरात प्रत्येक बौध्द अनुयायांनी घरात विविध उपक्रमानी साजरी केली
येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे मोजक्याच चार ते पाच मंडळींची सकाळी सात वाजता पंचरंगी ध्वजाचे पुजन करुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास रोहण सरतापे या चुमूकल्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधीकर्ते कुमार सरतापे यांनी बुध्द, धर्म, संघ वंदना घेतली
यावेळी सर्व धम्मबांधवाना आवाहन करण्यात आले की कोणी हि पाच पेक्षा जास्त लोकांनी समाज मंदिरात येवू नये प्रत्येक बांधवांनी घरीच प्रतिमा पुजन करुन सहकार्य करावे त्याच प्रमाणे कोरोना व्हायरस या विषाणू बाबत प्रशासन पोलिस यांनी केलेल्या सुचनांचा आदर करुन घरात बसुन प्रशासनास सहकार्य करावे असे कुमार सरतापे यांनी सांगीतले
ङ वेगळ्या उपक्रमाचे अनेका कडुन कौतुकङ
दैनिक तरुण भारतचे म्हसवड येथील प्रतिनिधी (पत्रकार) एल के सरतापे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोरोना व्हायरस मुळे जमावबंदी व लॉकडाऊन असल्याने विविध आजाराने विविध हॉस्पीटल व आरोग्य केंद्रात विविध आजाराने उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना हॉटेल , खानावळ बंद असल्याने उपास मारीला सामोरं जावे लागत होते त्यांना जेवणांची अडचण येत होती हॉस्पीटल बाहेर जावे तर पोलिसाच्या काठीचा प्रसाद मिळत होता व मोटार सायकल हि जप्त होत होती अशा अडचणीत सापडलेल्या रुग्नाची व त्यांच्या नातेवाईकांची अडचण झाली होती हे पत्रकार एल के सरतापे यांच्या लक्षात आलेल्या नंतर रुग्णांना मोफत जागेवर जेवून देण्याचा उपक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिना पासुन सुरु केला या उपक्रमास मोलाची साथ माजी नगरसेवक कैलास भोरे, संजय टाकणे , बबडु अबदागिरे, महेश कांबळे, प्रशांत जोशी यांनी केली असुन लॉकडाऊन उठे पर्यंत हा उपक्रम कोणते हि फोटोशेसन न करता राबवणार असल्याचे कैलास भोरे यांनी सांगीतले
उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी – या उपक्रमाला मनापासुन धन्यवाद म्हसवड मध्ये अनेक सेवाभावी संस्था घरोघरी धान्य, जिवनावश्यक साहित्य देत आहेत पण या उपक्रमाने भुकेल्याची भुक भागणार आहे परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन प्रत्येकांने या काळात मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन सौ सुर्यवंशी यांनी केले
डॉ प्रमोद गावडे – पत्रकार सरतापे व त्यांच्या मित्रांनी राबवलेल्या या सामाजिक भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाला आजच्या घडीला तर तोंड नाही याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे
दलित साहित्यक व व्याख्याते प्रा.शरद गायकवाड – लॉकडाऊन व संचार बंदी मुळे आजारी माणसांना दोन वेळचे जेवण देण्याचा जयंतीनिमित्त राबवत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद