प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील म्हाऊस गावामध्ये देसाईवाडा या ठिकाणी निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची समस्या यासंदर्भाचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊन सुद्धा आज मंगळवारी फक्त सदर वाडय़ावर अर्धा तास पाणीपुरवठा करण्यात आला. त्याचप्रमाणे याच पंचायत क्षेत्रातील झरमे गावांमध्ये गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे.
यामुळे सदर गावातील नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केलेला आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील माऊस गावातील देसाईवाडा या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिक नैसर्गिक नदीच्या पाण्याचा वापर करीत आहे .यामुळे सदर भागातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणामाची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे पाणीपुरवठा खात्याने सदर भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशा प्रकारची मागणी करणारे वृत्त मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. यामुळे याखात्याची यंत्रणा जागृत होऊन सदर भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या हल करण्याच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने लक्ष देतील अशा सकाळचा अंदाज होता मात्र तो अंदाज पूर्णपणे फोल ठरला.
याबाबत नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी फक्त अर्ध्या तास नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला .यामुळे पुन्हा एकदा नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केलेला आहे. ही बाब फक्त ऑपरेटरच्या मनमानी कारभारामुळे होत असून अधिकारीवर्ग त्यांच्यावर कारवाई का गरज नाही अशा प्रकारचा सवाल सदर भागातील ग्रामस्था?नी केला आहे .
याबाबत सदर भागातील महिला वर्गाने दिलेल्या माहितीनुसार या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली तीव्र टंचाई यांच्या पार्श्वभूमीवर आता सहनशीलतेच्या पलीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयावर घागरी मोर्चा नेल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचा इशारा देण्यात आला असून दोन दिवसात पाणीपुरवठा करा अन्यथा घागरी मोर्चाला सामोरे जावे अशा प्रकारचा इशारा या भागातील खास करून महिला भगिनीनी दिलेला आहे.
झरमें गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई.
याच गावापासून जवळपास 3 कि.मी. अंतरावर असलेल्या झरमें गावात गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. सध्यातरी सदर भागातील नागरिक छप्परातून खाली गळणारे पावसाचे पाणी याचा वापर करीत असल्याची बाब समोर आलेली आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केलेला आहे. गेल्या वषी अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भागाचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन याबाबत पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांना चांगल्याप्रकारे धारेवर धरले होते. आता आठ दिवसापासून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी दोन दिवसात वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिलेला आहे.
नागरिकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गेल्या आठ दिवसापासून या गावातील नळाना फक्त पंधरा मिनिटेच पाणीपुरवठा होत असतो. यातून घरातील पाण्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही असे यावेळी नागरिकांनी सांगितले.