भिरोंडा 3 मधून निकिता नार्वेकर बिनविरोध, म्हाऊस 2 मधून विठो वरक बिनविरोध
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण चार प्रभागातून सहा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. म्हाऊस पंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन मधून विठो शामू खरवत तर भिरोंडा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मधून निकिता नामदेव नार्वेकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची शक्मयता निर्माण झालेली आहे.
पिसुर्ले 7 मधून 4 उमेदवार.
या पंचायतीच्या प्रभाग सात बघून एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये हिरोजीराव दीपाजी राणे, दीपाजी हिरोजीराव राणे, जाणू धूळो खरवत व सर्वेश शिवाजी गावकर यांचा समावेश आहे. या भागाचे पंच सभासद सगुण वाडकर यांची जिल्हा पंचायत सभासद म्हणून नियुक्ती झाल्यामुळे सदर स्थान रिक्त झाले होते. यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
म्हाऊस 3 मधून 2 उमेदवार
म्हाऊस पंचायतीच्या तीन प्रभागातून एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यात कुंजल कृष्णा गावस व रेश्मा पुष्पा गावस यांचा समावेश आहे. भागातील पंचायत सभासद देवयानी गावस यांची जिल्हा पंचायत निवड झाल्यामुळे हे स्थान रिक्त झाले होते. त्याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
म्हाऊस प्रभाग 2 मधून विठो वरक बिनविरोध
निवडणूक अधिकारी व सत्तरी तालुक्मयाच्या संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग 2 मधून विठोबा वरक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची शक्मयता निर्माण झालेली आहे. अर्जाची छाननी 5 मार्च रोजी होणार असून 6 मार्च रोजी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची मुदत आहे. त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
भिरोंडा 3 मधून निकिता नार्वेकर बिनविरोध
भिरोंडा पंचायतीच्या प्रभाग तीन या मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निकिता नंदा नार्वेकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. या भागाच्या पंच सभासदानी पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे स्थान रिक्त झाले होते. त्याठिकाणी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची शक्मयता निर्माण झालेली आहे.