मुंबई/प्रतिनिधी
राज्य सरकारने अभय योजनेची घोषणा करुन म्हाडा सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, गृहराज्य मंत्रालयाने १ एप्रिल १९९८ ते २०२१ पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्यात येणार आहे, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना अभय योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हाडाच्या इमारतीत राहणार्या तब्बल १ लाख ८१ हजार रहिवाशांना या अभय योजनेचा लाभ होणार आहे. तसंच म्हाडात राहणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन प्रणालीद्वारे घरातुनच सेवा शुल्क भरता येणार असल्याने म्हाडा रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.