प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या दुर्लक्षित वागण्यामुळे संपुर्ण गोवा अचंबित झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीत सामान्यत: राज्यातील नागरिकांना केंद्र आणि राज्यातील काही महत्वाच्या पर्यावरणविषयक निर्णयाबद्दल थोडी स्पष्टता मिळण्याची संधी असते. पण पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले की त्यांना गोमंतकीयांची काळजी नाही. असे आपचे समयंवक राहुल म्हांबरे यांनी सांगितले
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादई विषयी कोणतीही चर्चा करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. अशा वागण्यामुळे असे दिसून येते कि ते गोव्यात त्यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची मजा लुटायला आले होते. त्यांना लोकांचे व शेतकऱयांचे काहीच पडलेले नाही असा आरोप राहुल म्हांबरे यांनी केला.
कर्नाटकात व गोव्यात भाजपाचे सरकार आहे आणि केंद्रात देखील भाजपाचेच सरकार आहे, तरीही म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे, म्हादई आमची आई आहेत, गोव्यासाठी म्हादई नदी शेती आणि समृद्ध जैवविविधतेचे स्त्राsत आहे. त्यामुळे म्हादईसाठी आम्ही आवज उठविणारच असे, राहुल म्हांबरे यांनी पुढे सांगितले.