प्रतिनिधी / म्हापसा
वाढत्या कोविडमुळे आणि सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या हेतूने व्यापारी संघटनेने 3 दिवस म्हापशातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी दिली. ज्या प्रमाणे गोमॅकोत ताण वाढला आयएमए डॉक्टर 15 दिवस लॉकडाऊन करण्यास सांगत असल्यास सरकारने यावर विचार करावा. लॉकडाऊन करायलाच पाहिजे. सरकार म्हणाला अर्थव्यवस्थेवर ताण येईल मात्र कुणावर व्यापारी किंवा इंडस्ट्रीवर येणार. गेल्यावेळी सरकारने आम्हाला काय दिले. गरज भासल्यास सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आणि भिण्याची गरज नाही हा डयलॉग बाजूला ठेवून भिण्याची गरज आहे हे सिग्नल देत तर ही आम्ही सांखळी तोडू शकणार. आज युवा वर्ग मरत आहे. पर्यटन बाहेर सरत नाही. सर्व लॉकडून होऊनसरकारने रुपरेषा आखावी असे आशिष शिरोडकर म्हणाले.