250 कोटी रुपये गेले पाण्यात
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा मलनिःस्सारण प्रकल्प उभारून म्हापशाचे आमदार तथा भाजप सरकारने म्हापसावासियांना धोका दिला आहे. म्हापशात अभारण्यात आलेला मलनिःस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती बनून राहिला असल्याचा आरोप आपचे संयोजक राहूल म्हांबरे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासमवेत आपचे सलमान खान, सुनिल सिंग्नापुरकर, श्रीपाद पेडणेकर, मानुअल कार्दोज उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 2012 साली सिम्पलेक्स कंपनीने काम सुरू केले. 122 कोटीची निविदा काढली त्यावेळी 2015 पर्यंत हे काम पूर्णत्वाकडे येईल असे आश्वासन त्याकाळी तत्कालीन मंत्री तथा आमदार स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी दिले होते. म्हापसावासियांना खूप त्रास झाला. घरात धूर झाला, तार नदी प्रदूषित झाली. नव्हेंबरमध्ये 2020 साली म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी हा प्रकल्प 2020 पर्यंत होईल असे सांगितले. आज आम्ही 2021 मध्ये आहोत मात्र हा प्रकल्प पांढरा हत्ती कसा येथे उभा आहे. जो प्रकल्प 150 कोटीचा होता तो आज 100 कोटी जास्त देऊन गंजलेल्या अवस्थेत उभा राहिला आहे, असे ते म्हणाले.
कंत्राट आहे ते म्हापसा व कळंगुटचीही तीच दशा झालेली आहे. आपण म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांना विचारू पाहतो हा पांढरा हत्ती उभा केला आहे ज्याला 250 कोटी खर्च केला आहे याला जबाबदार कोण. हा प्रकल्प कधी उभा राहणार. आमदाराचे अवघे दोन महिने आहेत. करदात्यांचे ज्यांचे पैसे गेले आहेत त्याला जबाबदार कोण असे ते म्हणाले. येथील भरपाई करणार काय याची माहिती द्यावी. तार नदी प्रदूषित होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे असा आरोप म्हंबरे यांनी केला.
आज 2021 पोचलो आहे येथे घोटाळा झाला आहे. भाजप वा काँग्रेस दोघेही यात गुंतलेले आहे. येथील मशीनरी गंजलेली आहे. ही पुन्हा सुरू होईल असे वाटत नाही. तार नदीची वाट लागली. पाईपलाईनमध्ये सर्वत्र माती भरली आहे ती साफ कशी करणार. चेंबर भरलेले आहेत. अशाने हा प्रकल्प पुढे कसा जाणार असा प्रश्न राहूल म्हांबरे यांनी उपस्थित केला आहे.