प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसाच्या परिवर्तनासाठी म्हापसेवासियांनी म्हापशेकारांचो एकवट पॅनलला मंते दिली होती. मात्र शुभांगी वायंगणकर, तारक आरोलकर, विकास आरोलकर व विराज फडते यांनी म्हापसेवासियांचा घात केला. त्यांनी आपल्यास नव्हे तर म्हापशातील नागरिकांचा विश्वासघात केला. जनता त्यांना याचे उत्तर योग्यवेळी देईल अशी माहिती म्हापशेकारांचो एकवटचे प्रमुख नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
म्हापशेकारांचो एकवटमधील चार नगरसेवक फुटून भाजपकडे गेले. परिवर्तनासाठी नागरिकांनी तुमच्या पॅनलला मते दिली हे नगरसेवक पैशासाठी त्या गटात गेले काय वा तुमचा आधार मिळाला नाही असा प्रश्न कांदोळकर यांना केला असता ते म्हणाले की, तेथे गेले हे सार्वजनिक हितासाठी की स्वतःच्या हितासाठी हे कळणे कठीण आहे. तारक पैशासाठी जाणार नाही. पण मला वाटते म्हापशेकारांनी विकास करण्यासाठी मते दिली होती. शुभांगी पैशासाठी गेली काय? वा मोठय़ा प्रमाणात देवाण घेवाण झाले हे सांगता येत नाही आणि आमच्याकडे पुरावाही नाही. सध्या कोरोना काळ सुरू आहे. विकासासाठी म्हापशात अर्थसहाय्य येतच नाही. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत अर्थसहाय्य आलेच नाही. चार वर्षाचे ग्रान्ट अद्याप मिळाले नाही. मात्र कोविडमुळे ते परत नेले. 14 फायनान्सचे महसूल येतो मात्र ते आम्हाला मिळत नाही. मागच्या वर्षी 15 लाख प्रत्येकी आले मात्र कामे झालीच नाही. प्रकल्प आहेत मात्र ते पुढे जात नाही.
म्हापशेकारांचो एकवट म्हापशेकारांनी कौल दिला त्याचा विश्वासघात झाला आहे. 2012 साली शुभांगी वायंगणकर दुसऱया गटात गेली तेव्हा त्यांनी लाखो रुपये घेतले असा प्रचार भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केला. तीच पुनरावृत्ती आता घडली काय? असा प्रश्न केला असता हे होऊ शकते मात्र आमच्याकडे पुरावे नाही. म्हापसा वासियांनी एक विश्वास ठेवला होता त्याचा आम्ही विश्वासघात करू नये असे श्री कांदोळकर म्हणाले.