बेळगाव : शासनाच्या विविध योजनांतून ग्रामीण भागाचा विकास साधला जात आहे. अशाच प्रकारे ‘आमचा गाव आमचा तलाव’ या योजनेंतर्गत म्हाळेनट्टी येथे तलावाची खोदाई करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच ग्रा. पं. अध्यक्षा चन्नम्मा तिरमाळे यांच्या हस्ते झाला. आमचा गाव आमचा तलाव योजनेंतर्गत धर्मस्थळ ग्रामीण विकास संस्था यांच्या सहकार्याने तलावाची खोदाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. पाण्याविना शेतकरी व जनावरांचे हाल होतात. याची दखल घेऊन ग्रामीण भागात पाण्याचे स्त्राsत निर्माण करण्यासाठी ही अभिनव योजना राबविण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य अमृत मुद्दाण्णावर, अप्पय्यगौडा पाटील, गुंडू कुरेण्णावर, राजू बाळेकुंद्री, लक्ष्मी सनदी, उमा कोलकार यासह लक्ष्मण कंग्राळकर, अरुण बाळेकुंद्री, लगमा सनदी, भरमा नाईक, सुरेश तिरमाळे, ज्योती कंग्राळकर, गिरीजा गडकरी, लक्ष्मी सोमनाथकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Articleमुलांना वाचन संस्कृतीकडे वळविणे गरजेचे
Next Article टिकेत यांची तातडीने सुटका करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.