विविध प्रश्नांवरून वातावरण तंग. आमदार व सरकारविरूध्द असलेल्या असंतोषाचे घडवाले दर्शन. रस्ते, जमिनीचा विषय, बेरोजगारी व इतर विषयांवरून नागरिक संतप्त.
डिचोली/प्रतिनिधी
गुरू. दि. 27 ऑगस्ट रोजी मये मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार प्रवीण झांटय़? यांच्यासह झालेल्या मतदारसंघ दौऱयाला वन म्हावळींगे कुडचिरे या पंचायतीतील म्हावळींगे गावात गालबोट लागले. व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि आमदार तसेच जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत मंडळ असताना विविविध विषयांवरून संतप्त बनलेल्या स्थानिक नागरिकांनी आमदारांना लक्ष्य बनविताना मुख्यमंत्र्यांनाही विविध प्रश्न केले. ता प्रकारामुळे म्हावळींगे गावातील सातेरी सभामंडपात वातावरण तंग झाले. आमदार प्रवीण झांटय़? यांना अखेर व्यासपीठावरच लोकांनी गराडा घातला. अखेर मुख्यमंत्र्यां?च्या सुरक्षारक्षकांनी व पोलिसांनी आमदारांच्या भोवती गराडा तयार करून सभागृहाबाहेर आणले.
म्हावळींगे गावातील जमिनीचा विषय मोठा आहे. त्यासाठी अनेकदा गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. जमिनीच्या विषयामुळेच गावात काहीच विकास होऊ शकत नाही. गावातील रस्त्यांचीही डागडुजी होत नाही. घरांचा विषय वेगळाच आहे. तसेच गावात असलेल्या नेस्ल? कंपनीत गावतील बेरोजगार युवकांना रोजगार न देता बाहेरील राज्यातील युवकांना रोजगार दिदा जातो. तसेच वाढलेली बेकारी यावर सरकार आणि मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वावर या भागातील लोक नाराजच आहेत. या नाराजीला या गावतील लोकां?नी मुख्यमंत्र्यांसमोरच प्रकट करीत मुख्यमंत्र्यांची बैठक चालू असतानाच आपला संताप व्यक्त केला. तरी मुख्यमंत्र्यांनी गरम झालेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
म्हावळींगे गावातील श्री. सातेरी मंदिराच्या सभागृहात आयोजित या बैठकीस सर्वप्रथम आमदार प्रवीण झांटय़? यांनी भाषण झाले. त्यानंतर ज्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दौऱयातील परंपरेप्रमाणे नागरिकांना काही समस्या असल्यास मांडण्यास सुचविले. त्यावर एक एक करून म्हावळींगेवासीयांनी रस्ता, योजना, जमीन, बेरोजगारी या विषयांवर मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले. सरकारी नोकऱया सोडाच, गावात नेस्ल? कंपनी आहे. मात्र त्यात स्थानिकांना कामाला घेत नाहीत. गावात बेरोजगारी वाढली असून आमदार काहीच करत नाही. ते आता साडेचार वर्षांनंतर या गावात आमच्या समोर आलेले आहेत. अशी कैफियत मांडली.
कैफियत मांडताच आमदार प्रवीण झांटय़? यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातातील माईक आपल्यकडे घेत नेस्ल?च्या अधिकाऱयांसोबत आपण अनेकदा बैठका घेतल्याचे सांगताच लोक संतप्त बनले. त्यां?नी झांटय़? यांच्यावर हल्ला चढवत आपल्याकडे काहीच होत नाही, केवळ बैठकाच घेण्याचे काम करतात, नंतर मात्र काहीच होत नाही, आपण काहीच कामाचे नसल्याचे म्हटले. या गावातील लोकांचा आतापर्यंत केवळ मतांसाठीच वापर झाला आहे. या सरकारने या गावाचे काहिच कल्याण केलेले नाही, अशी तक्रार मांडली.
या सर्व प्रकारानंतरही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि लोक काही प्रमाणात शांतही झाले. त्यातच आपले भाषण मुख्यमंत्र्यांनी उरकून घेत या गावच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासनही दिले. गोंधळातच ही बैठक समाप्त झाली आणि मुख्यमंत्री सुरक्षारक्षक आणि पोलिसांच्या गराडय़ात आपल्या वाहनापर्यंत गेले. मात्र आमदार प्रवीण झांटय़? हे लोकांची गाराणी ऐकण्यासाठी व्यासपीठावर असतानाच त्यांना लोकांनी गराडा घातला आणि उलटसुलट प्रश्न विचरण्यास सुरूवात केली. यावेळी लोकांनी आमदारांवरील आपला संपूर्ण रोष प्रकट केला. व्यासपीठावर परिस्थिती तणावाची बनल्याचे वाहनात बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकांना पाठवून आमदार झांटय़? यांना वाहनापर्यंत आणण्याची सुचना केली.
त्यानंतर सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी मिळून झांटय़? यांना गराडा तयार करून सभागृहाच्या बाहेर आणले. त्यावेळीही उपस्थित लोकांनी आमदारांवर उलटसुलट शेरेबाजी केली व गोंधळ घातला. या मतदारसंघाच्या दिवसभराच्या दौऱयाला म्हावळींगे गावात गालबोट लागले. या गावातील लोकांच्याही समस्या तशा रास्तच आहे. त्या सोडविण्याचा स्थानिक आमदार कमी पडल्याची त्यांची तक्रार असून या गोष्टीचा रोष व्यक्त करण्याची मिळालेली संधी या गावातील लोकांनी सोडली नाही. एक महत्त्वाची बाब म्हणजे या पंचायतीच्या सरपंचा असलेल्या शीतल सावळ यांनी या दौऱयातील वन व कुडचिरे येथील बैठकांना उत्साही हजेरी लावली. मात्र म्हावळींगे गावातील बैठकीला मात्र त्यांनी येण्याचे टाळल्याने बैठकीनंतर लोकांनी त्यांच्याविरोधातही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.