नाकावर हात धरून करावा लागतो प्रवास : मनपा व कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरातील महत्त्वाचे प्रवेशद्वार असणाऱया आणि सतत गजबजत राहणाऱया यंदेखूटला कचऱयाचे ग्रहण लागले आहे. या समस्येतून यंदेखूट कधी एकदा मोकळा श्वास घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. येथून प्रवास करताना नागरिकांना नाकावर हात ठेवून प्रवास करावा लागतो. ही समस्या सोडविण्याकडे महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष होत असून येथील कचरा हटवावा, अशी मागणी होत आहे.
यंदे खूट हे सतत वर्दळीचे ठिकाण असणारी जागा. या ठिकाणावरून दररोज शेकडो नागरिक प्रवास करत असतात. या रस्त्यावरून चंदगडसह गोवा व इतर तालुक्मयातील नागरिक दररोज ये-जा करत असतात. मात्र, मुख्य प्रवेशद्वारावरच कचरा फेकण्यात येत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, सध्या कोरोनामुळे शाळांना सुटी असली तरी या ठिकाणी कचरा साचण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
वनिता विद्यालयासमोरील यंदे खूट येथे हा कचरा साचला आहे. या आधीही येथे कचरा साचत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची तक्रार संबंधितांकडे करण्यात आली. मात्र, अजूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिसरातून प्रवास करताना नागरिक नाकावर हात ठेवूनच प्रवास करताना दिसत आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा कचरा येथेच पडल्याने समस्या निर्माण होत आहे. अनेकांचे आरोग्यही धोक्मयात येण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील कचरा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.