ऑनलाईन टीम / यवतमाळ :
सोलापुरात अडकलेल्या मजुरांना झारखंला घेऊन जाणाऱ्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले. तर 15 जण जखमी झाले आहेत. यवतमाळच्या अरणी तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात अडकलेले झारखंडमधील मजूर विशेष एसटी बसने झारखंडकडेनिघाले होते. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास नागपूर-बोरी-तुळापूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरला या एसटी बसने जोरदार धडक दिली. या धडकेत चार जण जागीच ठार झाले तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.