वार्ताहर/ कराड
अधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितींची स्थापना केली. त्यांच्याच जयंतीदिनी जिल्हा परिषदेची विशेष सभा आज येथे पार पडली. जिल्हा परिषद पदाधिकाऱयांची मुदत 20 मार्चला संपत असल्याने पदाधिकारी, सदस्यांची ही शेवटचीच सभा ठरली. त्यामुळे ते यावेळी भावुक झाले. दरम्यान सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल 20 मार्चला संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी दरवर्षी येथे जिल्हा परिषदेची विशेष सभा होते. त्यानुसार आज येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही शेवटचीच सभा पार पडली. त्यामध्ये विविध विभागांच्या विषयावर चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या कार्यकालातील त्यांची ही शेवटचीच सभा असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी भावुक झाले.
सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालविकास सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अर्चना वाघमळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने आदीसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.