ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘माफिया राज’ संपवण्यासाठी मी मठ सोडलं आणि राजकारणात आलो, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजकारणात प्रवेश करण्यामागचं ‘कारण’ सांगितलं. 1994-95 च्या कालखंडाचा संदर्भ देत योगी म्हणाले, त्यावेळी मी खूप लहान होतो. माझ्यासाठी मठाचा वारसा नवीन होता. त्या काळात व्यापारी व लोकांची घरं बळकावल्याची अनेक प्रकरणं समोर येत होती. माझ्या समोर एका कुटुंबाचं घर माफियांनी बळकावून ताब्यात घेतलं. शिवाय, माफियांनी अनेकांच्या इमारतीही पाडल्या. या घटनेनी मी संतप्त झालो. एका घटनेत माझ्या घरावर कब्जा करणाऱ्या गुंडांना जनतेनं चोप दिला. तेव्हाच मी मनाशी ठरवलं, आपल्याला राजकारणात जाऊन माफिया राज संपवायचाय आणि मी लागलीच निर्णय घेतला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांची तुलना कोरोनाशी केली आणि तिन्ही माफिया हा कोरोना व्हायरसपेक्षाही (Coronavirus) भयंकर आहे. माफिया हा फक्त माफियाच आहे, त्याला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) भाजपला (BJP) 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी योगींनी सपावरही जोरदार निशाणा साधत टीका केली.