आंबेवाडी येथील प्रकाराने संताप : कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे गावकऱयांना नाहक त्रास, तातडीने रस्ता करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ात आलेल्या पुरामुळे आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील मुख्य रस्ता वाहून गेला होता. त्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, आंबेवाडी ते कडोलीपर्यंतच्या रस्त्यासाठीही निधी मंजूर झाला असून त्यासाठी पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि कंत्राटदाराची अवकृपा दिसून आली. आंबेवाडी गावची यात्रा दि. 2 एप्रिल रोजी मोठय़ा भक्तिभावाने केली जाते. मात्र, गावातील रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी होत आहे.
आंबेवाडी ते कडोली हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी कडोली-आंबेवाडी रस्ता करण्यात आला होता. मात्र, हा रस्ताही अर्धवट करण्यात आला. कडोलीपासून सुमारे एक ते दीड कि. मी. अंतर असणारा रस्ता अर्धवट सोडून कंत्राटदाराने पोबारा केला होता. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप क्यक्त करण्यात आला. आताही तशीच अवस्था आंबेवाडी गावातील रस्त्याची झाली आहे.
आंबेवाडी गावातील रस्ता करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. तातडीने रस्ता करू, असे आश्वासन दिलेल्या कंत्राटदाराने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
रस्त्याची खोदाई करून तो अर्धवट ठेवण्यात आला आहे. परिणामी खोदाई केलेल्या रस्त्यावर पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. एका बाजूने खोदाई केल्याने चढ-उतार अशी अवस्था बनली आहे. परिणामी हा रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गावातील मुख्य रस्ता खोदाई करून अर्धवट ठेवण्यात आल्याने वाहनचालकांची मोठी गोची होत आहे. रस्त्यावर चिखल असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंबेवाडी ते कडोलीपर्यंतच्या रस्त्यासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आंबेवाडी गावची यात्रा जवळ आल्याने गावातील रस्ता करणे गरजेचे होते, असे मत नागरिकांतून क्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा रस्ता यात्रेआधी होणार की नाही? असा सवाल उपस्थित होत असून तातडीने रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.