ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात 5G मोबाईल सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. हा लिलाव झाल्यानंतर देशात 5G मोबाईल सेवा सुरू केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
देशातील खेडोपाडय़ांमध्येही इंटरनेट सेवा पोहचावी, हा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक टेलिकॉम कंपन्यांनी 5G साठी ट्रायलही सुरू केलं होतं. आता 2022 मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. त्यानंतर देशात 5G च्या लाँचिंगसाठी योजना आणल्या जातील. पीपीपी मॉडेलअंतर्गत गाव आणि रिमोट एरियामध्ये फायबर ऑपटिक्सद्वारे इंटरनेट पोहोचवलं जाईल, जेणेकरुन सर्वांनाच चांगली कनेक्टिविटी मिळेल.
5G नेटवर्क सर्वात आगोदर देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये उपलब्ध केले जाईल. ज्या शहरांमध्ये टेलिकॉम कंपन्यांकडून सध्या 5G सेवेची ट्रायल सुरू आहे. त्यानंतर देशातील इतर शहरात ही सेवा उपलब्ध होणार आहे