ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकट आणि दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार सोनिया गांधी बुधवारी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते गोविंद सिंह डोटासरा यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.
ते म्हणाले, कोरोना आणि शेतकरी आंदोलन या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर सोनियाजी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी गेल्या 12 दिवसांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून आलेले शेतकरी आंदोलन करत आहेत. सध्या हे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन बसले आहेत.