वृक्ष तोडला नाही तर खांद्यावर उचलून अन्यत्र हलविला
वृक्ष हे जीवनदायी असूनही विकासाच्या नावावर त्याची कत्तल केली जाते. जंगलाची तोड होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. अशा स्थितीतही काही लोक उत्तम भविष्यासाठी जंगलांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक केवळ वृक्षारोपण करत नसून झाडांना तोडण्यापासून वाचवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल हे छायाचित्र याचाच पुरावा आहे. या छायाचित्राने सोशल मीडियावरील लोकांचे मनच जिंकले आहे.
झारखंडमधील उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी हे छायाचित्र प्रसारित केले आहे. ‘एक छायाचित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक व्यक्त होते’ अशी कॅप्शनही त्यांनी दिली आहे. या छायाचित्रात 6 युवक काठीच्या मदतीने वृक्षाला खांद्यावर घेत अन्यत्र हलविताना दिसून येतात.
संजय कुमार यांच्या या ट्विटला आतापर्यंत साडेपाच हजारांहून अधिक लाइक्स आणि 528 रीट्विट मिळाले आहेत. तसेच शेकडो लोकांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत या युवकांना पर्यावरणाचा सच्चा संरक्षक संबोधिले आहे.