ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत.
अदानी समूहाला सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे 50 वर्षांचे कंत्राट मिळाले आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये लखनऊ, अहमदाबाद आणि मंगळूर विमानतळाचे कंत्राट मिळाले होते. आता स्पर्धकांच्या तुलनेत अधिक रकमेची बोली लावून अदानी समूहाने हे कंत्राट मिळवले आहे. प्रति प्रवासी अनुक्रमे 177, 174, 171, 168 आणि 115 रुपये भाडे निश्चित केले. या करारामुळे पुढील 50 वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे.