हुबळी/प्रतिनिधी
हुबळी-धारवाड जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लहरीपेक्षा दुसर्या लहरीदरम्यान कोरोनामुळे अधिक मृत्यू झाले आहेत. यावर्षी एप्रिल आणि मेमध्ये कोरोनामुळे ३३४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये (३ मार्च २०१पर्यंत) एका वर्षात एकूण ६१८ रुग्ण कोरोनामुळे मरण पावले होते. या वर्षाच्या मध्यभागी कोरोनाची दुसरी लाट आली. सुरुवातीला परिस्थिती इतकी गंभीर नव्हती. कालांतराने कोरोनाचा प्रसार वेगाने होत गेला. रुग्णाबरोबरच मृतांची संख्याही वाढली. दरम्यान एप्रिल आणि मेमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच राहिले. यासह मृतांची संख्याही वाढली.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्याने मे महिन्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळवणे कठीण झाले. राज्यात रुग्णसंख्या वाढत राहिल्याने राज्य सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यांनतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.
जिल्ह्यात एप्रिलमध्ये एकूण ७,४६० प्रकरणे आढळून आली आहेत आणि बरे झाल्यानंतर ३,९९३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोविड साथीच्या आजारामुळे एकूण ७७ लोकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात एकूण २५२८१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये २३ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर २७७रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेची तुलना केली तर मे महिन्यात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.