मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे, ”या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे!!! सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे..कसली तयारी नाही.. फक्त नाटक आणि ढोंगीपणा..शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे.. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल..तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!!”
भाजप नेते चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर यांनी या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारव टीका केली आहे.