ऑनलाईन टीम / मुंबई :
महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजने बतात सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत श्वसना संबंधित 20 आजारांसाठी आता रुग्णालयात मोफत उपचार होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, या उपचारासाठी पैसे घेतले तर 5 पट दंड लावण्याचा, परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली. या बैठकीतगणेशोत्सव, कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावर चर्चा झाली.
सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील यावर लक्ष द्यावे. तसेच गणपती आगमन आणि विसर्जनाची मिरवणुकीवर मर्यादा हवी आणि सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा केला जावा असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.
तसेच जिमबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगत ते म्हणाले की, आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार कोणत्या गोष्टी शिथिल करायच्या याचा अधिकारही मुख्यमंत्र्यांचा असेल.
कोरोना संदर्भात बोलताना ते म्हणाले, कोरोना मृत्युदर 1 टक्क्यांच्या आत आणणे हा आमचा मुख्य हेतू असून सगळ्यांनी मिशन मोडवर काम करण्याचे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना केले आहे. तसेचकॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.