ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसप्रणीत युपीएचे अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसला डिवचले. त्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असता त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर काँग्रेसने पलटवार केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींना सुनावले आहे. “ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? मला वाटते की त्यांनी वेडेपणा सुरू केला आहे. त्यांना वाटतंय की पूर्ण भारत ‘ममता, ममता’ म्हणू लागला आहे. परंतु भारत म्हणजे बंगाल नाही आणि बंगाल म्हणजे भारत नाही. पश्चिम बंगालमधील मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वापरलेली युक्ती आता हळूहळू उघड होत आहेत,” असे अधीर रंजन चौधरी एएनआयशी बोलताना म्हणाले.