पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांचा इशारा
कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील युरिया व रासायनिक खतावरील लिंकिंग रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कसबा बीड येथील करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिला. लॉकडाऊनच्या काळात विविध कंपन्या कडून युरिया रासायनिक खताचा तुटवडा भासवला गेला, परिणामी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला. खरीप हंगामात शेतकऱ्याना जादा दराने खताचे वितरण केले जाते. युरिया खतावरील लिकिंग रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सुर्यवंशी यांना एका व्यापक शिष्ट मंडळाद्वारे जिल्हा कृर्षी अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातर्फ दिला.
करवीर तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासुन युरिया टंचाई निर्माण झाली आहे. विविध रासायनिक खतावर दुकानदारांच्या कडून सुरु असलेली लिकिंग सुरू आहे ती त्वरीत रद्द करावी. शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वेळेवर पुरवठा न केल्यास शेतकरी रस्त्यावरील आंदोलन छेडतील. खत कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरीत रासायनिक खतांचा पुरवठा करावा अशी मागणीही निवेदनाद्वारे केली. खरीप हंगामात युरिया खताचा पुरवठा करून लिंकिग त्वरीत रद्द करावी यां मागणीचे लेखी निवेदन राजेंद्र सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषि अधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्ट मंडळात राजेंद्र सुर्यवंशी, टी. जी. पाटील, रंगराव पाटील, अशोक चौगले, आदिचा समावेश होता.