प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे आश्वासन : युवा काँग्रेसतर्फे बेरोजगार दिन साजरा
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस सत्तेवर आल्यास युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रधान्य देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले आहे. सध्या केंद्रात तसेच राज्यत असलेले सरकार प्रत्येक पाऊलावर जनतेची फसवणूक करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्या अगोदर जाहिर केले होते की वर्षाला 2 कोटी युवकांना नोकऱया देणार तसेच गोव्यातही भाजप सरकारने जाहिर केले होते की पाच वर्षात 50 हजार युवकांना नोकऱया देणार आज सात वर्ष झाली तरी भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही याच्यातूनच भाजपचा खोटारडेपणा उघड होत असल्याचेही चोडणकर म्हणाले.
गोवा युवा काँग्रेसने येथील आझाद मैदानावर अयोजित केलेल्या राष्ट्रीय बेरोजगार दिवस कार्यक्रमात गिरीश चोडणकर बोलत होते. सरकारच्या नाकरतेपणामुळे देशात तसेच राज्यात बेकारी माठय़ाप्रमाणात वाढली आहे. सरकारचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी युवा काँग्रेसने जी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे ती वाखाडण्यासारखी आहे. ही मोहिम अशीच सुरु ठेवण्याचा सल्लाही चोडणकर यांनी युवा काँग्रेस समितीला देऊन त्यांचे अभिनंदनही केले. सरकार प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरले असून आता येणाऱया निडणूकीत जनता त्यांना घरी पाठविणार आहे यात शंकाच नाही. राज्यातील रस्त्यांची स्थिती बिकट बनली आहे. अपघातांना निमंत्रण मिळत आहे. कायदा सुव्यवस्था कोलमडली असून नियमित गुन्हेगारी प्रकरणे घडत आहेत. आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. सरकार जनतेच्या विरोधात घेत असलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची पाळी आहे असेही चोडणकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बेरोजगारी वाढविण्यास कारणीभूत असून त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून बेरोजगारी दिवस राष्ट्रभर साजरा करण्यात येत आहे. त्याच्याच एक भाग म्हणून गोव्यातही युवा काँग्रेसने हा दिवस साजरा केला होता. राज्यातली युवकांच्या बेरोजगारा प्रश्न सरकार समोर मांडणार असून तो ताडीस लावण्यासाठी रस्त्यावर येण्याचीही तयारी असल्याचे युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले. राज्यात तसेच देशात वाढती बेरोजगारी पाहिल्यास युवकांचे भवितव्य काळोखात आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे जनते समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने कुणी विज मोफत देण्याच्या घोषणा करतात तर कुणी पाणी मोफत देत आहेत. गोव्यातील युवक हा स्वाभिमानी असून त्यांना कुणाची भिक नको त्यांना रोजगार हवा आहे. काँग्रेस युवकांना रोजगार देण्यास समर्थ आहे असेही वरद म्हार्दोळ कर यांनी सांगितले. सरकारच्या अपयशामुळे निर्माण झालेली बेरोजगारी विरोधात जनजार्गती कार्यक्रम 100 दिवस चालणार असून गावगावात जाऊन युवा काँग्रेस जनजागृती करणार असल्याचेही वरद म्हार्दोळकर म्हणाले.
येथील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रुदाल्फ फर्नांडिस, सलिल वळवईकर, माजी आमदार प्रताप गावस, सचिन परब, कर्नाटक युवा काँग्रेसचे अध्यक्ष मोहमद नादफ, राष्टीय युवा काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव, संकल्प आमोणकर, प्रकाश राठोड यांनी समयोजित भाषण केले. यावेळी सुमारे 150 काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.