काकती पोलिसांची कारवाई, 24 तासात मुसक्मया आवळल्या
प्रतिनिधी/ बेळगाव
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन काकती पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ 24 तासांत संशयितांच्या मुसक्मया आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणी काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अमर शाम मेत्री (वय 24), अखिल सिध्दाप्पा मेत्री (वय 27), सुनील दयानंद बाळाप्पागोळ (वय 27), परशराम रामाप्पा इरगार (वय 26, सर्व रा. काकती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी मध्यरात्री काकती येथील पेट्रोलपंप जवळील सर्व्हिस रोडवर दोन गटात भांडण सुरू होते. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सलाउद्दीन नजीरसाब पकाली (वय 32, रा. काकती) या युवकाचा चाकुने भोसकून खून करण्यात आला होता. खुनानंतर आरोपी फरारी झाले होते.
पोलिसांनी या प्रकरणी चौघा जणांना अटक केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. अत्यंत क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडली आहे. काकती पोलीस निश्चित कारण शोधत आहेत.