‘मुंबई/प्रतिनिधी
देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. पण सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने घेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती. आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार आहे.
दरम्यान आयपीएलचा उर्वरित हंगाम यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली.
आज बीसीसीआयची विशेष बैठक हा घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. तसेच बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. याबैठकीत पुढील दिशा ठरणार आहे. परंतु भारतामधील कोरोनास्थितीचा आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.