4 टप्प्यात मतदान; आचारसंहिता लागू
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात निवडणूक आयोगाने आज पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. उत्तर प्रदेशात 75 जिल्ह्यांमध्ये चार टप्प्यात पंचायत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 15 एप्रिल रोजी होणार आहे. दुसरा टप्पा 19 एप्रिलला, 26 एप्रिलला तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा 29 एप्रिलला होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणी होईल.
सीतापूरच्या 3, बहराच 1 आणि गौंडाच्या 9 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने तिथे निवडणूक होणार नाही. पहिल्या टप्प्यातील सर्व 18 प्रभागांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मतदान होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.