ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संकटात राज्य सरकारकडून पालकांना दिलासा मिळाला आहे. कारण येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या फी मध्ये कोणतीही वाढ करू नका असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
या आदेशात शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोणत्याही प्रकारची फी वाढ करू नये, तसेच या काळात फी एकाच वेळी न घेता मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने जमा करण्याचा पर्याय पालकांना उपलब्ध करून देण्यात यावा. लॉक डाऊन मध्ये ऑनलाईन फी भरण्याचा पर्याय खुला करून द्यावा. येणाऱ्या वर्षात जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही तर त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारणी समितीमध्ये ठराव करून शिक्षा संस्थांनी योग्य प्रमाणात फी कमी करावी, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पदवी आणि पदव्युत्तरच्या फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आले आहेत, अशी घोषणा आजच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.