प्रतिनिधी / बेळगाव :
येळ्ळूर परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये झाडे तोडली गेली. मात्र पुन्हा झाडांची लागवड करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा पंचायत सदस्य आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
येळ्ळूर मुख्य रस्त्याबरोबरच स्मशानभूमीमध्येही वृक्षारोपण करण्यात आले आहे. रमेश गोरल यांनी येळ्ळूरचा विकास साधावा यासाठी पहिल्यापासूनच प्रयत्न केले आहेत. पाण्याच्या समस्येसाठी त्यांनी जिल्हा पंचायतीच्या प्रत्येक बैठकीत आवाज उठविला आहे. गावच्या पाई&पलाईनसाठी जिल्हा पंचायतमधून मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत गावचा विकास करण्याची जिद्द रमेश गोरल यांनी बाळगली आहे.
पावसाळय़ात वृक्षारोपण करुन येळ्ळूरला एक नवे स्वरुप निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष रुक्मिणी नाईक, गटनेते वामन पाटील, ग्राम पंचायत सदस्य तानाजी हलगेकर, सतीश कुगजी, राजू पावले, रमेश धामणेकर, राजू उघाडे, राकेश परीट, परशराम परीट, सुजाता उडकेकर, पिडीओ अरुण नाईक, डी. जी. पाटील, हणमंत पाटील, भोला पाखरे, प्रकाश पाटील, परशराम धामणेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य अनंत पाटील, मोहन पाटील, विलास बेडरे, बाळू गोरल, पप्पू कुंडेकर, वाडी शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील, शिवाजी सांबरेकर यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.