हातातोंडाला आलेले भात पिक वाया जाण्याची भिती
प्रतिनिधी/ येळ्ळूर
पावसाने यावषी चांगली साथ दिली होती. त्यामुळे येळ्ळूर परिसरातील भात पिके जोमात होती. मात्र हातातोंडाला आलेल्या या भात पिकावर मावा रोग पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेवटच्या टप्प्यात अशा प्रकारे रोग पडत असल्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठा फटका बसला असून आता याचा सर्व्हे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
येळ्ळूर परिसरात बासमती पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बासमतीवर रोग पडत असल्यामुळे शेतकऱयांनी बासमती उत्पादन घेणे कमी केले आहे. शेतीत करावा लागणारा खर्च आणि उत्पादन यासाठी ना इलाजास्तव काही शेतकरी बासमतीची पेरणी केली होती. मात्र यावषी अखेरच्या टप्प्यात बासमतीवर मावा रोग पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून बासमती पिकावरच हा मावा रोग जास्त असल्याचे शेतकऱयांतून सांगण्यात आले. बासमतीबरोबरच इतर पिकांवरही आता या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून आता कोणत्या प्रकारचे पिक घ्यायचे, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे.