प्रतिनिधी / बेळगाव
आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरनगर येथील पाणी निचरा होण्यासाठी येळ्ळूर रस्त्यावरील बळ्ळारी नाल्यापर्यंत ‘त्या’ मोठय़ा गटारींमधील कचरा काढून रस्त्याला लागूनच बाजूला टाकण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कचरा तसाच पडून आहे. त्यामुळे पादचाऱयांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे. तसेच या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मॉर्निंग वॉकर्सना मोठा त्रास होत असून अपघात घडण्याची शक्मयता आहे. तेव्हा तातडीने दोन्ही बाजूच्या कचऱयाची उचल करावी, अशी मागणी होत आहे.
आनंदनगरसह परिसरातील पाणी या नाल्यातून मोठय़ा प्रमाणात जाते. डेनेजचे पाणी तर बारा महिने या नाल्यातूनच वाहत असते. पावसाळय़ात पाणी निचरा होत नसल्यामुळे तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे केशवनगर, अन्नपूर्णेश्वरनगर परिसराला दरवषी पाण्याचा फटका बसत आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे नाल्याची खोदाई करण्यात आली. मात्र जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आलेल्या कचरा नाल्याच्या बाजूलाच टाकण्यात आला आहे.
येळ्ळूरला जाणारा तो रस्ता मुळातच अरुंद आहे. त्याचबरोबर रस्त्याबाजूला कचरा टाकल्यामुळे चालणेदेखील अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने तो कचरा हटवावा, अशी मागणी होत आहे.
अपघात घडण्याची शक्यता
एकाचवेळी दोन वाहने समोरासमोर आली तर रस्त्याच्या बाजूला दुचाकी किंवा इतर वाहने घेणे धोक्मयाचे ठरत आहे. कचऱयाचा ढीग असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला वाहन घेणे अवघड आहे. त्यामुळे वाहनांची एकमेकाला धडक बसण्याची शक्मयता आहे. तेव्हा अपघात घडण्यापूर्वीच तातडीने हा कचरा हटवावा, अशी मागणी होत आहे.