उत्तरार्ध
आता बडा ख्याल, छोटा ख्याल, ठुमरी यांची ओळख झालेली असते. नाटय़गीतांमध्ये असणारे यमनचे रूपडे आता जवळचे वाटते. वेडेवाकडे का होईना पण आपले गाणे मांडण्याची धडपड जोरात सुरू असते. कधी कधी ते किंचित जमायला लागले असेही वाटते. रागाचे अस्तित्त्व हे महासागरासारखे अथांग असते आणि त्याची मनाला ओढ लागते. देवाघरचे ज्ञात कुणाला किंवा नाथ हा माझा मधले स्वरसौ÷व आता पुनः पुन्हा निरखावे वाटते. एकच गाणे वेगवेगळय़ा गायकांनी वेगवेगळय़ा पद्धतीने गायिले आहे हे जाणवू लागते. त्यातले अधिक मोहक काय ते पकडावे असे वाटते. आता तानांचा पाऊस ऐकून सुखावायला होते तर संथपणे चालणारे विलंबितमधले गायन भारून टाकायला
लागते.
किनारे किनारे किनारे दरिया गळय़ातून छान वाटते आणि वाद्यावरही सुंदर वाटते. सनईच्या सुरातला यमन आणि संतूरवरचा यमन वेगळीच जादू करायला लागतो. ऐकणे वाढत जाते, आनंद वाढत जातो आणि समाधान मात्र कमी कमी होत जाते. ऐकत शिकत चुकतमाकत नवशिक्मया विद्यार्थ्यांचे रूपांतर कलाकारात होते. स्वतः यमन मांडायला तो शिकतो आणि त्यावर विचार करीत राहतो. शोधत राहतो आणि हरवल्यासारखे होत राहते म्हणून गुरुजींना शंका विचारतो आणि गुरुजी मिश्किलपणे परत उद्गारतात. ‘मनाची खोली अथांग असते बाळा! आणि ये मन है!’ खरोखरच जेव्हा जेव्हा एखादे शिखर गाठण्याचा प्रयत्न सार्थकी लागतो असे वाटते तेव्हाच खरेतर लक्षात येते की अरेच्चा आपण शिखर गाठले असे जे आपल्याला वाटत होते तो शुद्ध भ्रम होता. आणि आता आपण अशा अनोळखी प्रदेशात पाऊल टाकतो आहोत की जिथल्या साध्या पाऊलवाटाही आपल्याला ठाऊक नाहीत. आता ठोकताळे मांडत मांडतच पुढे जायचे आहे. तेव्हा परत एकदा डाव नव्याने खेळायचा! एकदा का चौकट जमायला लागली की खरी सुरुवात असते. कारण चौकटीत महिरपीही असंख्य असतात. आणि चौकटीतली चित्रे तर हिशेबात धरूच नयेत. कारण रोजच्या रोज एक नवीन चित्र त्या चौकटीत बसवता येते. कधी कधी तर अनेक चित्रांचा कोलाज होऊन येतो. तोही बसवता येतो. यमन अर्थात ज्याला कल्याण असेही ओळखले जाते तो खरेतर एक पूर्ण थाट आहे. त्यामुळे त्या मूळ जनक रागामध्ये अनेक रागमिश्रणे करून जोडरागही सादर होतात. मोठमोठे तयारीचे कलाकार असे जोडराग बहारीने सादर करून कमालीचा आनंद श्रोत्यांना देतात.
मोगरा फुलला सोबत दरवळणारा गोरखकल्याण, जयतकल्याण, पूर्वाकल्याण, उस्ताद बिसमिल्लाखांसाहेबांनी सनईच्या अपूर्व गोडीसोबत सर्वसामान्यांपर्यंत पोचवलेला श्यामाकल्याण, तंतुवाद्यासोबत विरघळत नेणारा पूरियाकल्याण तसेच पं. सी. आर. व्यासांना प्राप्त झालेला धनकोनी कल्याण हे सर्व धनत्तर राग यमनचेच कुळपुरुष! म्हणूनच या सर्व गोष्टींशी अपरिचित असणाऱया श्रोत्याला या सर्व रागांमधल्या सुरावटी किंवा गाणी ऐकल्यानंतर या सगळय़ात काहीतरी साम्य जाणवते. अमुक ऐकल्यावर त्या तमुक सारखे काहीतरी ऐकतोय असे वाटते. कुठे कुठे ओळखीचे स्वर बरेच सापडतात, तर कुठेकुठे आपणच चकलो की काय याचा मुळी अंदाजच लागत नाही. पण मध्येच काहीतरी मिळून गेल्याची हुरहूर लागून राहते. तोंडावळा सारखाच असतो म्हणून तर गोतावळा ओळखू येतो म्हणतात ते गाण्याच्याही बाबतीत खरे असावे. शास्त्रीय संगीतापासून ते फिल्मी गीतांपर्यंत सर्वत्र सारखा सापडत राहणारा यमन हा जरी एकच असला तरीही त्याचे उगमस्थान म्हणजे अभिजात संगीतच आहे आणि जिज्ञासू व्यक्ती जेव्हा हे अधिकाधिक अभ्यासत जाते तेव्हा तिला हे नक्कीच कळू शकते की हा राग वरील वेगवेगळय़ा गीतप्रकारांमधून तितक्मयाच वैविध्याने सामोरा येतो त्याचप्रमाणे तो रागसंगीतातही असतो. एखाद्या रागाचे स्वरूप आणि वैशिष्टय़े जर का अधिकाधिक जाणायची असतील तर त्या रागाच्या अधिकाधिक बंदिशी अभ्यासणे आवश्यक असते असे या क्षेत्रातली ज्ये÷ मंडळी म्हणतात.
याचे कारण शोधू पाहताना जाणकार होऊ इच्छिणाऱयाला असे सापडते की प्रत्येक बंदिशीची बाह्यरेषा वेगळी असते. त्याचप्रमाणे तीत असणारी सौंदर्यस्थळे हीसुद्धा बदलत असतात. तालाच्या हिशेबाने व त्यातील आकृतिबंध व सौ÷व यावरूनही फरक पडत जातो. तसेच प्रत्येक बंदिशीचे शब्दही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जरी मुख्य माध्यम स्वर हे असले तरीही. प्रत्येक चीज ही मूलतः एक कविता असल्यामुळे विषय वेगवेगळे असतात. बहुसंख्य चिजा या शृंगारिक असतात तर काही चिजा या आध्यात्मिकही असतात. त्यामुळे राग एकच असला तरी त्याचा ‘मूड’ अर्थात भावावस्था बदलते. शृंगारिक चिजेत विभ्रम, लडिवाळपणा, भावनांची वादळे या विषयांना अर्थात अग्रक्रम असतो त्यामुळे ते दर्शवणारी स्वरवाक्मये असतात तर आध्यात्मिक बैठक असणाऱया चिजेत धीरगंभीरता, ठाशीवपणा परतत्त्वदर्शक भाव याचे प्राबल्य असते.
तेव्हा अशा यमनचा मोहरा येरी आलि पिया बिन सारखा खचितच असणार नाही. आणि या सर्व गोष्टी लक्षात घेऊनही पं. भीमसेन जोशींची येरी आलि पिया बिन आणि पं. गणपती भट यांनी तीच गायिली तर परत प्रचंड फरक असेलच. तोही प्रेम कमालीची काटेकोर आणि सौंदर्यपूर्ण असूनही.
विचार करीत राहिलो तर खूप गोष्टी आहेत. क्मया टूटा है अंदर अंदर, क्मयों चेहरा कुम्हलाया है सारखी हरिहरनची गझल म्हणजे यमनचे अगदी साजुक सोज्ज्वळ घरगुती रूप असल्यासारखे वाटते. (ती एक गझल असूनही!) परंतु प्रत्येक शेराचा शेवट आरोहात एकाएकी कोमल रिषभाचे बोट धरून वेगाने मारव्याकडे निघून जातो तेव्हा संध्याकाळचा तिन्हीसांजेकडचा कातर प्रवास एका ओळीत यमनला काय खुलवतो! वरवर अतिशय शांत आणि नेहमीसारखाच दिसणारा माणूस जेव्हा चारचौघात वावरतो त्याचे ते रूप म्हणजे यमन! आणि आतली भयंकर वेदना क्षणभरासाठीच चेहऱयावर झर्रकन चमकून लुप्त होते आणि पुन्हा प्रसन्न चेहरा समोर येतो. तेवढेच दाखवण्यापुरते मारव्याचे क्षणकाल अस्तित्त्व! पुन्हा येऊन पाणी मिळते ते यमनसागरातच! हे केवळ याच ठिकाणी नाही तर कितीतरी गाण्यांमध्ये होते. कीर्तनाच्या नमनामधून यमन धुमाळीच्या ठेक्मयात दरवळत येतो. तोच यमन एखाद्या खटकेबाज ठसकेबाज लावणीतून गिरक्मया घेत लवलवत येताना भेटतो. कव्वालीत त्याची अदा नकाबपोश सौंदर्यवतीसारखी असते.
माणिक वर्मांच्या गाण्यात तो त्यांच्यासारखाच लडिवाळ असतो तर पं. मालिनी राजूरकरांच्या गळय़ातून तो धुवांधार होऊन कोसळतो. भावगीतातला चंचल यमन भक्तिगीतात सात्त्विक होऊन येतो. एखाद्या निरांजनात तेवणाऱया वातीसारखाच. तर अभंगात तो टाळमृदंगाइतकाच बेभान रांगडा भासतो. अगदी वारकरी असावा तसाच. त्याचा मूळ स्वभाव हा शांत आणि भक्तिरसाचा आहे. मनाला आणि मग आत्म्यालाही लागू होणारे ‘नैनं छिन्दति शस्त्राणि यालाही लागू होतेच. उगीच नाही त्याला म्हणत, ये मन
है!