भरती प्रक्रियेबाबत केली विचारणा
ऑनलाईन टीम / गोरखपूर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ हिंदूत्वाच्या मुद्यावरुन वारंवार चर्चेत असतात. उत्तर प्रदेशातील बनावट कोरोना चाचण्यांचे प्रकरणावरुन ही बरेच दिवस चर्चेत होते. यानंतर सद्या ते आणखी एका कार्यक्रमाला हजर होते. यावेळी तरुणांनी बेरोजगारावरुन त्यांना प्रश्न विचारत रोष व्यक्त केला यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर येथील एका महाविद्यालयात पोहोचले असता त्यांना तरुणांनी बेरोगारावरुन प्रश्न विचारण्यास सुरु केले. मात्र आदित्य नाथ यांनी याकडे दुर्लक्ष करत तेथुन काढता पाय घेतला. हा व्हिडिओ माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील वाढत्या बेरोजगारीमुळे युवा वर्ग निराश असून, आपल्या भविष्याबद्दल ते चिंतीत आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे काही दिवस अर्थिक उलाढाली मंदावल्या असल्या तरी युवकांच्या हाताला काम मिळणे ही तितकेच आवश्यक आहे.
या व्हिडीओमध्ये दिसतंय, की मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसोबत पुढे जात आहेत. याच दरम्यान, आजूबाजूला उभे असलेले सर्व तरुण आरडाओरड करतात आणि त्यांना बघून नोकऱ्यांबद्दल प्रश्न विचारतात. महाराज जी, भरती प्रक्रिया अजून आली नाही का ? ( आर्मी भरतिया कहिया आई महाराज जी ? ) असं विचारतात. मात्र, मुख्यमंत्री या तरुणांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. आता मात्र युवकांवर गुन्हा दाखल होईल का ? हा देशद्रोह ठरेल का ? की त्यांना गुंड घोषित करून त्यांचे घर पाडले जाईल ? हे पाहणे उत्सुकतेच ठरेल. मात्र आता तरुणांना समजले आहे की. युवा शक्ती जिंदाबाद.”