सहारनपूर : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहारनपूरच्या मां शाकंबरी विद्यापीठाच्या कार्याच्या शुभारंभप्रसंगी बोलताना पश्चिम उत्तरप्रदेशात विकासकार्य करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंड-माफियांपासून मुक्ती मिळवून दिल्याचे म्हटले आहे. योगींच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशातील माफिया आणि गुंडांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. तसेच हत्या, लुटपाटीच्या घटना मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याचा दावा शाह यांनी केला. पूर्ण जगात भारताला सन्मान मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. योगींनी उत्तरप्रदेशला भ्रष्टाचाराच्या मार्गावरून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर आणण्याचे काम केले. अखिलेश यादव यांच्या सरकारच्या कार्यकाळात उत्तरप्रदेशात माफियांचे वर्चस्व होते, राज्यात कायदा-सुव्यवस्था लागू करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. योगींच्या शासनात दरोडय़ाच्या घटनांमध्ये 70 टक्क्यांची घट झाली आहे. लुटीच्या घटना 69 टक्के, हत्येच्या घटनांमध्ये 30 टक्के आणि हुंडाबळींमध्ये 22.5 टक्क्यांची घट झाल्याचे विधान शाह यांनी केले.
Previous Articleपंगुम लंघयते गिरीम्!
Next Article प्रदूषणावर दिल्ली सरकारला ‘सर्वोच्च’ फटकार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.