ज्योती कुंकळकर यांचे प्रतिपादन : कालची-आजची सुगरण परिसंवाद
प्रतिनिधी / पणजी
वस्तूसंग्रहालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही या खात्यातर्फे ‘दुधात फराळ’ हा विषय घेवून सुंदर फोटोचे प्रदर्शन आणि ‘दुधाचा फराळ’ बनवलेल्या वस्तूचा प्रदर्शन लावले होते. उद्घाटन झाल्यानंतर, कालची सुगरण आणि आजची सुगरण या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होत. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी लेखिका ज्योती कुंकळकर होत्या. योग्य आहार ही आरोग्याची गुंतवणूक असते, असे प्रतिपादन यावेळी कुंकळकर यांनी केले.
आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या, आहाराविषयक नियम न पाळल्याने जे तोटे होतात, त्यापेक्षा जास्त तोटो आधुनिक आहार पद्धत स्वीकारल्यामुळे होत आहे. पूर्वी आमचे नातेवाईक घरी येताना घरी बनविलेले लाडू, चकल्या, आणायचे, आता आमच्या मुलांना त्यांचे मामा, काका, केक आईक्रिम आणतात इथंपासून काल आणि आज फरक आहे. आम्हाला खाद्य संस्कृती आहे. आणि त्याचे जतन कालची सुगरण करायची म्हणजे ऋतुनुसार पदार्थ शिजवायचा. त्यामुळे पावसाळ्यातल्या गार वातावरण असो वा उष्ण हवा असो. तब्येतीला काही फरक पडत नसे.
यावेळी व्यापीठावर जयंती नायक, मनस्वीनी प्रभुणे, गजानंद जोग आणि वसंत सावंत उपस्थित होते. डॉ. नायक म्हणाल्या, कालच्या सुगरणीला ना हातान ना मापाचा अंदाज, ना कसली यत्रंण पण प्रत्येक पारपंरिक जिन्नस चविचा व्हायचा. काळ बदलला आणि नव-नवीन पाककृती आजची पिढी करायला लागली. सुबत्ता आली, गुळाची जागा, साखरने घेतल्यामुळे आताच्या पहिला परिणाम आरोग्यावर वाईट परिणाम झाला. शरीराला साखरेपेक्षा गुळाची जास्त गरज आहे.
मनस्वीनी आपल्या मनोगतात म्हणाल्या. मदल्या काळात स्वयंपाक करणे म्हणजे कमीपणाचे मानायचे. पण आज त्या स्वयंपाकाला पूर्वीची प्रतिष्ठा आली आहे. माझ्या आई आजीचा वा सासूचा स्वयंपाक मला कधीच जमणार नाही. कारण जीवनशैली बदलली आहे. त्यांचा चुलीतला जाळ किती कमी – अधिक यांच्यावर जेवण छान शिजल जायच. आम्हाला वेळ लावावा लागतो.
लेखक गप्पानंद जोग म्हणाले, पूर्वीचा स्वयंपाक घरांतल्या सगळ्या महिला आपल्या हातानी करायच्या त्यात दळणण् वाटण सगळ यायच आजच्या स्वयंपाक यंत्र करतात. पण आजच्या सुगरणीचा नाईलाज आहे. कारण त्या नोकरी करतात.
लेखक वसंत सावंत म्हणाले आजच्या पिढीला घरी बनवलेले जेवण, अल्पहार, सोडून बाहेरचे, फास्टफूड बाहेर जावून खायची वा घरी मागवून घेण्याची सवय झाली आहे. ही आहार पद्धत क्षणिक सुख देणारी आहे. कार्यक्रमाला लेखकांची लक्षणीय उपस्थिती होती.