प्रतिनिधी/ रत्नागिरी, खेड
कोरोना रूग्णसंख्येच्या चढत्या आलेखाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरासह ग्रामीण भागात जवळपास लॉकडाऊनसारखी स्थिती होती. याचा परिणाम म्हणून रंगपंचमी यंदा लहानग्यांसाठी गडद, तर तरूणाईसाठी फिकी पडली. वाढत्या कोरोनामुळे नागरिकांनी गर्दी न करता घरच्या घरी उत्सव साजरा केला. नेहमीप्रमाणे युवावर्गाने जल्लोषात रंगपंचमी साजरी केली नसली तरी बच्चेकंपनीने सणाचा मनमुराद आनंद लुटला.
गेल्या 2-3 आठवडय़ापासून रत्नागिरी जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळून सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शासन व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतेकांनी आपल्या घरीच रंगपंचमी साधेपणाने साजरी केली. बच्चेकंपनीने मात्र या सणाचा पुरेपूर आनंद घेत एकमेकांना रंग लावला. बहुतांश लोकांनी इकोप्रेंडली रंगपंचमी साजरी केलीण् शहरात दुपारच्या वेळेत तर ग्रामीण भागात सकाळीच रंगपंचमी साजरी करण्यात आली.
जिह्यात दरवर्षी शिमगोत्सवाची सांगता रंगपंचमीच्या दिवशी शिंपण्याने होते. बच्चेकंपनीसह तरूणाईकडून डीजे, ढोल-ताशाच्या तालावर जल्लोष करत दुपारपासूनच रंगपंचमी साजरी होते. यात महिलांचाही तितकाच उत्स्फूर्त सहभाग असतो. मात्र यावर्षी पोलीस यंत्रणेकडून शहरातील विविध ठिकाणी दरवर्षी जल्लोषात साजऱया होणाऱया रंगपंचमीवर बंधने घालण्यात आली. यामुळे डीजे, ढोल-ताशाचा सूर-ताल नसल्याने तरूणाईकडून रंगपंचमी साजरी झालीच नाही. लहानग्यांनी मात्र जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. रंगाने भरलेल्या बादल्या, रंगाच्या पाण्याचे फुगे व पिचकाऱयांनी एकमेकांवर रंग उडवत बच्चेकंपनी लाल, गुलाबी, हिरव्या रंगांनी गडद झाल्याचे दिसले. तरीही गतवर्षीप्रमाणे सोबतीला तरूणाईचा जल्लोष नसल्याची खंत त्यांच्या चेहऱयावर दिसत होती.